सैन्याला युध्दात सज्ज ठेवण्यासाठी 22हजार कोटींचा करार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
युध्दासारख्या आणीबाणी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी भारताने मोठी पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यात सरकारने दारूगोळयासहित युध्दासाठी गरजेच्या असणऱया इतर साहित्याशी संबंधित 20 हजार कोटींचे करार केले असून त्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. शॉर्ट नाटीसवरही सेना दलाचे जवान, टँक्स पायदळ आणि युध्दनौका युध्दासाठी तयार असावेत, याची खात्री सरकारकडून केली जात असून त्यासाठीच हे करार केले जात आहेत.
संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युध्दपरिस्थिती निर्माण झाल्यास भारतीय सेनेला दारूगोळयाची कमतरता भासू नये आणि शत्रुला कमीत कमी 10 दिवस कडवी झुंज देता यावी, हा यामगचा मुख्य अद्देश आहे.