बेळगाव : शहरात कचऱयाची समस्या अजूनही जैसे थे आहे. महापालिकेच्यावतीने गल्लोगल्ली कचराकुंडीची व्यवस्था केली आहे. मात्र कचराकुंडीत नागरिक कचरा न टाकता इतरत्र टाकत आहेत. असाच प्रकार टिळकवाडी गजानन महाराजनगर येथे घडत आहे. या परिसरातील नागरिक आपल्या घरातील ओला आणि सुका कचरा रस्त्याच्या कडेला टाकत आहेत. त्यामुळे गजानन महाराजनगर परिसरात कचऱयाचे साम्राज्य पसरले आहे. तसेच या ठिकाणी कचराकुंडी नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. कचराकुंडी नसल्याने नागरिक आपल्या घरातील कचरा रस्त्यावर टाकत असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. तसेच या भागातील नागरिकांनी महापालिकेला कळवून देखील महापालिकेने येथील कचरा उचलण्याकडे कानाडोळा केला असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
Previous Articleचन्नम्मानगर विविध समस्यांच्या विळख्यात
Next Article मराठमोळय़ा संस्कृतीचे कुदेमानी ग्रंथदिंडीत दर्शन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment