सुरक्षित व वेळेत रेल्वे प्रवासावर सरकारने भर दिला आहे. रेल्वेचे उत्पन्न कमी असल्याने उत्पन्नवाढीसाठी नव्या योजना आणण्याचे संकेत अर्थमंत्र्यांनी दिले आहेत. रेल्वेच्या जमिनीचा उपयोग सौर उर्जा निर्मितीसाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘तेजस’च्या धर्तीवर आणखी काही नव्या गाडय़ा सुरू करण्यात येणार असून त्या पर्यटन स्थळांशी जोडल्या जाणार आहेत. त्याचबरोबर नाशवंत मालाच्या वाहतुकीसाठी पीपीपीच्या माध्यमातून ‘किसान रेल’ सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. खासगी सरकारी भागिदारीतून (पीपीपी) 1150 नव्या रेल्वेगाडय़ा सुरू करण्यात येणार असून 4 रेल्वे स्थानकांचाही खासगी भागिदारीतून पुनर्विकास करण्यात येणार आहे. देशभरातील मानवरहित रेल्वे क्रॉसिंग पूर्णपणे बंद करण्यात येणार असून 550 स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी 27 हजार किमी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण केले जाणार आहे. रेल्वे मार्गाजवळ मोठे सौर उर्जा प्रकल्प उभारणे प्रस्तावित आहे. बेंगळूरमध्ये 148 किमीचा उपनगरीय रेल्वे प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. यासाठी 18 हजार 600 कोटींचा खर्च होणार असून त्यातील 25 टक्के निधी केंद्र सरकारकडून दिला जाणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
Previous Articleचटपटीत स्टार्टर
Next Article मल्ल रविंद्रकुमारवर चार वर्षांची बंदी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment