बेळगाव : न्यू वैभवनगर येथील समस्यांमुळे जनता हैराण झाली असून या समस्या सोडवून मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. न्यू वैभवनगरमध्ये 10 ते 15 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. न्यू वैभवनगरमध्ये रवा फॅक्टरी आहे. त्या फॅक्टरीचे दूषित पाणी उघडय़ावर सोडण्यात येत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. या वसाहतीमधील रस्ते अत्यंत अरुंद आहेत. ते रस्ते करणे गरजेचे आहे. रवा फॅक्टरीच्या दूषित पाण्यामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. वृद्धांना त्याचा अधिक त्रास होत आहे. तेव्हा रवा फॅक्टरीवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी शकील अनगोळकर, इस्माईल खंदाळे, ऋतुजा देसाई, मुस्ताक बाळप्रवेश, बी. ए. मोमीन, आर. ए. जमादार, आर. ए. इनामदार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Previous Articleकबुतरांचा छंद, कायद्यात बंद…..
Next Article चन्नम्मानगर विविध समस्यांच्या विळख्यात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment