संगमेश्वर / दीपक भोसले
गेली पंधरा वर्षे तो आपल्या आईच्या शोधात होता. अनेक शहरात फिरुन त्याने आपल्या आईचा शोध घेण्याचा अयशस्वी पयत्न केला. अखेर तामिळनाडू येथील एका सज्जन माणसामुळे दुरावलेल्या माय-लेकरांची भेट झाली. संगमेश्वर जवळच्या कोसुंब येथील अभिषेक जाधव केवळ 5 वर्षाचा असताना आईला पारखा झाला होता. आईचा चेहराही धड आठवत नव्हता अशा स्थितीत 15 वर्षानंतर झालेल्या या भेटीने शब्दात न सामावणाऱया आनंदाची त्याला अनुभूती आली.
कोसुंब गावचे माजी सरपंच रवींद्र जाधव यांची पत्नी रंजना रवींद्र जाधव या पंधरा वर्षापूर्वी अचानक बेपत्ता झाल्या होत्या. जाधव कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्याचा सर्वतोपरी पयत्न केला. पोलिसांनीही आपल्या पध्दतीने त्यांना शोधण्याचे काम केले. परंतु त्याला यश येत नव्हते. या घटनेला 15 वर्षांचा कालावधी झाल्याने एका बाजूला शोध सुरु असतानाच त्या सापडण्याची आशा मावळत चालली होती. परंतु नियती अनेकदा चांगले क्षणही लिहून ठेवते त्याप्रमाणे कोणाच्याही ध्यानीमनी नसताना तब्बल 15 वर्षांनर बेपत्ता रंजना यांचा ठावठिकाणा सापडला व त्यानंतर अल्पावधीतच या माय-लेकरांची भेटही झाली.
15 वर्षांपूर्वी रंजना जाधव अस्थिर मानसिक स्थितीमध्ये आपल्या घरून निघाल्यावर रेल्वेस्थानकापर्यंत येऊन सोमर दिसलेल्या रेल्वेत बसल्या. या रेल्वेतून त्या थेट तामिळनाडूला पोहोचल्या. वेगळी भाषा, संस्कृती व राहणीमान असलेल्या तामिळनाडूमध्ये गेली अनेक वर्षे त्यांची भटकंती सुरुच होती. कोणीतरी त्यांना तामिळनाडू येथील वेल्लोर येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यावेळी येथील एका सज्जन माणसाने त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता रंजना यांनी त्या संगमेश्वर तालुक्यातील असल्याची माहिती दिली.
रंजना यांचा पत्ता समजल्यावर त्या सज्जन गृहस्थाने फेसबुक आणि इतर सोशल मिडियाचा आधार घेत जाधव कुटुंबियांचा शोध सुरु केला. काही दिवसांच्या प्रयत्नांनंतर जाश्रव कुटुंबाशी संपर्प साधण्यात ते यशस्वीही झाले. सुदैवाने त्यांचा संपर्प झाला तोही तिच्या पोटचा गोळा अभिषेकशीच…! पहिल्यांदा यावर विश्वासच न बसलेल्या अभिषेकने त्यानंतर कुटुंबिय, मित्र व व आप्तेष्यांच्या मदतीने पुढील हालचाली वेगाने करत आपल्या माऊलीला परत मिळवले.
अभिषेकला आपल्या आईविषयी माहिती मिळताच त्याने दिनेश व शरद जाधव याच्याशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते विनोद जाधव यांच्याशी संपर्प साधून त्यांच्या मदतीने रंजना यांना कोसुंब येथे आणण्यासाठी लागणाऱया शासकीय कागदपत्रांची पूर्तता केली. तामिळनाडू ते कोसुंब असा पवास करीत शुकवारी त्या आपल्या कोसुंब येथील घरी पोहोचल्या. 15 वर्षांपूर्वी मागे सोडलेला जीवाभावाचा परिसंर, संसार, अवघ्या 5 वर्षाचा असताना दुरावलेला व आता उमदा तरुण म्हणून समोर आलेला काळजाता तुकडा अभिषेक, सोबत अनेक ओळखीचे चेहरे पाहून रंजना यांना भावना अनावर झशल्या होत्या. एक-दोन नव्हे तर तब्बल पंधरा जिच्या प्रेमवर्षावाला आपण पोरके झालो त्या तन्मदात्रीला प्रत्यण समोर पाहताना अभिषेकही पुरता हावून गेला होता. काहीशी अशीच स्थिती तेथष उपस्थित प्रत्येकाचीच झाली होती.
त्यावेळी अभिषेक होता पाच वर्षाचा
रंजना बेपत्ता झाल्यी तेव्हा अभिषेक केवळ 5 वर्षाचा होता. त्याला एक ब हीणही आहे. वडिलांचा मृत्यू व आई बेपत्ता झाल्यामुळे अfिभषेकची सर्व जबाबदारी त्याचा मामाने आणि गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली. अभिषेकने मामाकडे राहत आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करुन पुणे येथे नोकरी स्वीकारली. जीवनात स्थीर होत असतानाच अपरिहार्यपणे जाणवणारी ‘आई’ची कमतरताही 15 वर्षांनंतर झालेल्या या सुवर्ण भेटीने संपली आहे.
Previous Articleमाढा तालुक्यात दोन कोरोनाबाधितांची भर; बाधितांचा आकडा शंभरीपार
Archana Banage
Archana Bange, a seasoned journalist with four years of experience, has made a notable impact in the field of journalism. She pursued her journalism studies at Shivaji University, Kolhapur, and began her career at Daily Sakal. Currently, Archana is a valued member of the Dainik Tarun Bharat group, where she focuses on reporting local news from the districts of Kolhapur, Sangli, Satara, Sindhudurg, and Ratnagiri in Western Maharashtra. Her expertise extends to various topics, including politics, breaking news, food, lifestyle, tourism, blogs, health, web stories, and captivating human interest stories.
Related Posts
Add A Comment