वार्ताहर / औंध
रणजितसिंह देशमुख यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून सातारा जिल्ह्यातील गेल्या नऊ महिन्यापासून रखडलेल्या चारा छावणीची बीले अदा करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.हरणाई उद्योग समुहाचे शिल्पकार रणजितसिंह देशमुख यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून रखडलेली बीले खात्यावर वर्ग करण्यात आल्यामुळे चारा छावणी चालकांना दिलासा मिळाला आहे.
छोट्या संस्था आर्थिक द्रुष्ट्या सक्षम नसल्याने त्यांना चारा छावणी सुरू करण्यासाठी शासनाने नकार दिल्यामुळे 2019 च्या भीषण दुष्काळी परस्थितीत प्रामुख्याने माण-खटाव मधील हतबल झालेल्या लोकांना लाखमोलाचे पशुधन जगवायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला होता.
अशा भीषण स्थितीत हरणाई उद्योग समुहाचे शिल्पकार रणजितसिंह देशमुख यांनी धोका पत्करून हरणाई सहकारी सुत गिरणी, माणदेशी मागासवर्गीय सहकारी सुत गिरणीच्या माध्यमातून माण-खटाव,फलटण तालुक्यात तब्बल पन्नास चारा छावण्याच्या माध्यमातून हजारो पशुधन जगवून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. सात महिने चारा छावण्या चालवून शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी पुढाकार घेतला होता. छावण्याच्या माध्यमातून पशुधन वाचले असले तरी चारा छावणी चालकांनाची गेल्या नऊ महिन्यापासून शासनाकडे कोट्यवधी रुपयांची बिले रखडली होती. ही बिले मिळण्यासाठी
रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली
मामुशेठ विरकर, शिवाजीराव बरकडे,संतोष सोनवलकर, दौलत जाधव,किसन सानप,अंकुश खरमाटे, शरद बागल,प्रा.दिलीपराव डोईफोडे, संतोष जाधव यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, मदत पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. श्रीनिवास पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.काल रणजितसिंह देशमुख यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन छावणीच्या बीलाचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती.
त्यांनी देखील तात्काळ निर्णय घेऊन जिल्हाधिकारी यांचेकडून माहिती घेऊन रखडलेली बिले अदा करण्याचे आदेश दिल्यामुळे नऊ महिन्यापासून रखडलेली बिले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन बिले अदा केल्याबद्दल छावणी चालकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना धन्यवाद दिले आहेत.
Previous Articleपाकिस्तानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2,57,914 वर
Next Article कोरोना संसर्गाचा वाहक की देशाचा सहाय्यक बनणार ?
Archana Banage
Archana Bange, a seasoned journalist with four years of experience, has made a notable impact in the field of journalism. She pursued her journalism studies at Shivaji University, Kolhapur, and began her career at Daily Sakal. Currently, Archana is a valued member of the Dainik Tarun Bharat group, where she focuses on reporting local news from the districts of Kolhapur, Sangli, Satara, Sindhudurg, and Ratnagiri in Western Maharashtra. Her expertise extends to various topics, including politics, breaking news, food, lifestyle, tourism, blogs, health, web stories, and captivating human interest stories.
Related Posts
Add A Comment