प्रतिनिधी /बेळगाव
राज्य तसेच देशात अंमली पदार्थ विक्रीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. युवापिढी या अंमली पदार्थांच्या आहारी गेली आहे. यामुळे युवापिढी वाया जात असून गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे अशा अंमली पदार्थ विक्री करणाऱयांवर कडक कारवाई करावी, यासाठी अंमली पदार्थ विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ने बुधवारी सहय़ांची मोहिम उघडण्यात आली होती.
चित्रपट अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या तपासावेळी अनेक अंमली पदार्थांच्या विक्री करणाऱयांचे रॅकेट समोर येत आहे. देश व राज्यात अंमली पदार्थ विक्री करण्यात येत असल्याचे यामुळे समोर येत आहे. यामुळे युवापिढीचे भविष्य धोक्मयात आले आहे. अंमली पदार्थ विक्री करणाऱयांवर कडक कारवाई करण्याची मागणी अभाविपतर्फे करण्यात आली.
यावेळी बोलताना अभाविपचे प्रमुख पृथ्वीकुमार म्हणाले, राज्यातील काही ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहजपणे अंमली पदार्थ मिळत आहेत. अंमली पदार्थ विक्रीमध्ये अनेक कलाकार व राजकारणी गुंतलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी हे अभियान चालविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील विविध भागात बुधवारी ही मोहिम आयोजित करण्यात आली होती. नागरिकांनीही सहय़ा करून या अभियानामध्ये सहभाग घेतला. यावेळी अभाविपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.