ऑनलाईन टीम / मुंबई :
इयत्ता अकरावीची सीईटी हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. तसेच इयत्ता दहावीच्या गुणांच्या आधारे मुलांना अकरावीमध्ये प्रवेश द्या, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयाबाबत बोलताना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हायकोर्टाने दिलेला निर्णय आम्ही तपासून पाहू असे म्हटले आहे.
- काय म्हणाल्या वर्षा गायकवाड ?
अकरावीच्या सीईटी परीक्षेसंदर्भात हायकोर्टाने आज निर्णय दिला. हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही अभ्यास करू आणि त्यानंतर पुढील निर्णय घेऊ.
पुढे त्या म्हणाल्या, आधीच विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुलांचे अकरावी प्रवेश लवकरात लवकर व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत हायकोर्टाने सीईटी रद्द करीत दहावीच्या गुणांवर अकरावीत प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत.