ऑनलाईन टीम / मुंबई :
अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, या परीक्षेसाठी वेगवेगळ्या मंडळांच्या विद्यार्थ्यांना दहावीचा राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असल्याने या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. यावर आज हायकोर्टाने निर्णय देत अकरावी प्रवेशांसाठी सीईटी परीक्षा रद्द केली. तसेच दहावी मूल्यांकनाच्या आधारे अकरावीला प्रवेश देण्याचे निर्देश दिले.
कोरोनामुळे विविध शिक्षण मंडळांच्या दहावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाही. या मंडळांनी अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांचे निकाल दिले. सर्व मंडळांची गुणांकनाची पद्धत एकसारखी नसल्याने राज्य सरकारने अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचा जीआर काढला होता. मात्र, या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आले. सीईटीसाठी वेगवेगळ्या मंडळांच्या विद्यार्थ्यांना दहावीचा राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असल्याने कोर्टानेही ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.