प्रतिनिधी / मोरजी
मागच्या आठ दिवसापासून मदतीची याचना करणाऱया मधला वाडा येथीलध्रुव कुडाळकर कुटुंबियांच्या मदतीला कुणीच धावून आला नाही अखेर आठ दिवसानंतर मात्र मांदेचे मगोचे नेते जित आरोलकर यांनी पेन उपलब्ध करून घरावर असलेले झाड कापून त्यांना दिलासा दिला .
चक्रीवादळाने 16 रोजी मधलावाडा मोरजी येथील ध्रुव कुडाळकर यांच्या राहत्या घरावर भलेमोठे आंब्याचे झाड पूर्ण घरावर व शेजारच्या घरावर पडले ,त्यातून लाखो रुपयांची नुकसानी झाली .
16 रोजी पडलेले झाड त्याच अवस्थेत घरावर होते ,जीववमुठीत घेवुन कुडाळकर कुटुंबीय जीवन जगत होते ,त्याच प्रमाणे शेजारील घरातील कुटुंबियांच्या घरावर 5 माड आंब्याचे झाड पडून वाहनांची नासधूस झाली त्यातून दोन्ही कुटुंबियांचे लाखो रुपये नुकसान झाले .
मागच्या आठ दिवसापासून हॅवकुटुंबिय मदतीची याचना करत होती ,झाड घरावर पडतातच सरकारी यंत्रणेला कळवले ,अग्निशमन दलाला कळवले मोरजी पंचायतीला लेखी कळवले शिवाय स्थानिक आमदार दयानंद सोपटे यांनाही काळकले मात्र आठ दिवस होऊन कोणीच मदतीला आले नाही आणि अडथळे दुर केले नाही .अखेर ही माहिती मांदेचे मगोचे नेते जित आरोलकर यांच्या कानावर ही घटना गेली त्यांनी वेळ न दडवता पेन आणून अडथळे दूर केले .
सरकारी यंत्रणा या दोन्ही घरांच्या कुटुंबियांच्या मदतीला आली नाही त्याबद्दल नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहे .
आमदार मंत्री केवळ निवडणुकीच्या काळात मतासाठी घरोघरी येतात मात्र चक्रीवादळ येऊन घरांची लाखो रुपये नुकसानी झाली त्याची कुणी साधी सरकारी यंत्रणेने चौकशी केली नाही त्याबद्दल नाराजीचा सूर व्यक्त होत आहे ,निवडणुका वेळी हेच आमदार मंत्री मात्र घरोघरी मतासाठी वारंवार येतात तर मग संकटकाळी का नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे .
टेक्सी मालक बेबलो सीमाईस यांनी प्रतिक्रिया देताना आमच्या घरावर पाच नारळाची झाडे आंब्याचे झाड पडून मोठय़ाप्रमाणात नुकसानी झाली वाहनांची हानी झाली आहे ,आता कोरोनामुळे टेक्सी व्यवसायही संकटात आहे ,उत्पनाचे साधन बंद झाले ,झाडे पडून घराच्या भिंती वाजलेल्या आहेत तडे गेले त्यामुळे अधिक धोका आहे ,सरकारने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली .
केदार कुडाळकर यांनी प्रतिक्रिया देताना ज्या दिवशी घरावर झाड पडले त्या दिवशी आपल्या वडिलांनी संबंधित खात्याला आंमदरालाही कळवले मात्र कुणीच मदतीला आला नाही ,मात्र सामाजिक कार्यकर्ते जित आरोलकर यांनी आमच्या मदतीला धावून येऊन अडथळे दूर केले ,जे आमदार सरकारी यंत्रणेने करायचे होते ते जित आरोलकर यांनी केले त्याबद्दल तेच भावी लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यामागे सर्वसामान्य जानता आहे असे म्हटले .
ध्रुव कुडाळकर यांनी प्रतिक्रिया देताना आठ दिवस होऊन गेले सरकारी यंत्रणा किंवा आमदार घराकडे फिरकले नाही ,पेडणे अग्निशमन दल मदतीला आले नाही ,सरकार कुणासाठी आहे तेच कळत नाही ,त्यांनी सरकारी यंत्रणेविषयी नाराजी व्यक्त केली .जित आरोलकर हे मदतीला आले त्याबद्दल त्यांनी आभार मानले .