ऑनलाईन टीम / मुंबर्ई :
राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या शेतकर्याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 19 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा दौरा करणार आहेत.
19 ऑक्टोबर ला ते बारामतीपासून आपला दौरा सुरू करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा आदी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्या दिवशी, दि. 20 रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत.
तिसर्या दिवशी दि. 21 नोव्हेंबरला ते हिंगोली, जालना, औरंगाबादचा दौरा करतील. या तीन दिवसांत 9 जिल्ह्यांमध्ये सुमारे 850 कि.मी.चा प्रवास ते करणार आहेत.