विनाकारण बाहेर पडणाऱयांची संख्या वाढतेय, सामाजिक अंतर न राखणे आदी प्रकार सुरूच,
बेळगाव / प्रतिनिधी
एकीकडे कोरोनाचे संकट गडद झाले असताना अद्यापही असंख्य नागरिकांकडून सूचनांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. त्यामुळे पुढील दिवसात याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून विनाकारण घराबाहेर फिरणाऱयांची संख्या वाढली आहे. लॉकडाऊनचा आदेश असतानाही मुद्दामहून बाहेर जाणारे वाढले आहेत. तर तोंडाला रुमाल किंवा मास्क न घालताच उघडपणे फिरणाऱयांचीही संख्या वाढली आहे. यातून संसर्ग पसरण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासन तसेच पोलिसांच्यावतीने अनेकदा सांगूनही काही लोकांमध्ये फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे.
लॉकडाऊनमधून जीवनावश्यक खरेदी करण्यासाठी काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. तसेच वेळही ठरवून देण्यात आली आहे. मात्र खरेदी करतानाही नियमांचे पालन होताना दिसत नाही. दुकानदारांनी दुकानासमोर गर्दी होऊ नये तसेच सुरक्षित अंतर राखण्यासाठी ठरावीक चौकटी बनविल्या आहेत. या चौकटीमध्ये उभे राहूनच खरेदी करण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र बऱयाच बेशिस्त नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. तर बरेच जण मास्क किंवा रुमाल न लावताच विनाकारण वाहनावरून फिरत आहेत. काही भाजी विपेते, फळ विपेतेही मास्क न लावताच भाजी आणि फळांची विक्री करत आहेत. अनेक ठिकाणी कोपऱयावर ही मंडळी दिसून येत असून भाजी तसेच फळ विपेत्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यामुळेही रस्त्यावरील गर्दीत वाढ होत आहे. यावर आळा घालण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी कडक धोरण राबविणे आवश्यक बनले आहे.