प्रतिनिधी / कोल्हापूर
बॉक्सच्या गुळाबाबत सहाव्या दिवशीही सौदें काढताना व्यापाऱयांनी मनमानी सुरुच होती. बाजार समितीत झालेला करार धुडकाऊन लावत जुन्या पद्धतीनेच सौदे सुरु केल्याने संतप्त शेतकरी कराराप्रमाणे सौदे काढा अशी मागणी करीत आक्रमक झाल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे काही काळ सौदे बंद झाले. परवाने जप्तीचा इशारा दिल्यानंतर पुन्हा सौदे सुरु झाले. बुधवारी ठाम तोडगा न निघाल्यास गुऱहाळ घरं बंद ठेवण्याचा इशारा शेतकऱयांनी दिला आहे.
बाजार समितीत गूळ सोदे बंद पाडण्याची मालिका सहाव्या दिवशीही सुरुच होती. पोलीस आणि बाजार समिती प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याने तात्पूर्ते सौदे सुरु झाले. तोडगा काढण्यासाठी बुधवारी अडते, व्यापारी आणि शेतकरी यांची बैठक होणार आहे.
शेतकरी गोंधळात
ऊन यावर्षीच्या हंगामाचा शुभारंभ झाला. पण 18 किलो गूळ रव्यांच्या बॉक्सच्या वजनावरुन व्यापारी आणि शेतकरी यांच्या संघर्ष झाला. याच मुद्यावर मंगळवारी सौदे निघू शकले नाहीत. हा प्रश्न मिटला असतानाही पुन्हा सौदे बंद झाल्यामुळे शेतकरी गोंधळून गेले. वारवार असा प्रकार होऊ लागल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत होते. अचानक सौदे बंद झाल्याने प्रशासक मंडळाचे सदस्य सूर्यकांत पाटील यांनी बाजार समितीला पूर्वसूचना न देता सौदे बंद ठेवल्यास परवाने रद्द करावे लागतील, असा इशारा दिला. त्यानंतर अध्यक्ष के. पी. पाटील यांनीही व्यापारी व शेतकरी यांच्याशी चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न केल. अखेर मंगळवारी आवक झालेल्या गुळाचे सौदे काढण्यात आले. मात्र बुधवारी सौदे होणार की नाही, याबाबत कोणतीही स्पष्ट सांगितले नाही. त्यामुळे गूळ बॉक्सवरुन शेतकरी, व्यापारी यांच्या संघर्ष वाढत असुन यात शेतकऱयांचे मोठे नुकसान होत आहे.
शासकीय अधिकारी व बाजार समिती प्रशासनाने आपल्यावर दबाव टाकून साडे आठरा किलो वजन धरण्याचा निर्णय लादला आहे. त्यामुळे हा निर्णय आम्हाला मान्य नाही, या मुद्यावर व्यापारी मात्र ठाम होते. त्यामुळे बुधवारच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे शेतकऱयांचे लक्ष लागले आहे.