फूटपाथवरील अतिक्रमणांबाबत स्मार्ट सिटी अधिकाऱयांची खंत : मनपा कर्मचाऱयांकडून जबाबदाऱया झटकण्याचे प्रकार
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बसथांबे, सायकल ट्रक आणि फूटपाथ निर्माण करण्यात आले आहेत. मात्र, याचा वापर फळ विपेते, भाजी विपेते व फेरीवाले करीत आहेत. त्यांना हटविण्याकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यकारी संचालक शशीधर कुरेर यांनी केला. महापालिकेने फेरीवाल्यांना हटविले नसल्यानेच जागेवर फेरीवाले आपला हक्क सांगत आहेत. याबाबत कारवाई करा, अन्यथा एक दिवस महापालिका कार्यालय आवारातच फेरीवाले आपला व्यवसाय थाटतील, अशी सूचना मनपा कर्मचाऱयांना केली.
सायकल ट्रक, फूटपाथवर अतिक्रमण करण्यात येत असल्याने यासंदर्भात मनपा कार्यालयात महापालिका अधिकारी व स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांची संयुक्त बैठक घेऊन विविध सूचना केल्या.
शहरात हेस्कॉम, पाणीपुरवठा मंडळ किंवा मोबाईल कंपन्यांनी रस्त्याची खोदाई केली असता याबाबतचा ठपका स्मार्ट सिटी कंपनीवर ठेवण्यात येत आहे. कोणतीही अडचण निर्माण झाल्यास स्मार्ट सिटी कंपनीचे काम सुरू असल्याचे सांगून महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी आपल्या जबाबदाऱया झटकत असल्याचे आढळून आले आहे. सर्वच अडचणींबाबत स्मार्ट सिटीवर खापर फोडून मनपाचे अधिकारी आपली बाजू व्यवस्थित असल्याचे सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्षात मनपाचे कर्मचारी व अधिकारी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत नसल्याचे दिसून आले आहे.
रस्ते महापालिकेचे की फेरीवाल्यांच्या मालकीचे!
कोटय़वधी रुपये खर्चून रस्त्याचा विकास करण्यात येत आहे. नागरिकांसाठी फूटपाथ, सायकल ट्रक अशा विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. मात्र, या फूटपाथवर व सायकल ट्रकवर फेरीवाल्यांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. जणू फेरीवाल्यांच्या मालकीचे रस्ते असल्याप्रमाणे काम करताना अडचणी निर्माण करत आहेत. फूटपाथचे काम करताना आमची संमती घ्या, अशी सूचना फेरीवाले करीत आहेत. त्यामुळे सदर रस्ते महापालिकेचे की फेरीवाल्यांच्या मालकीचे, असा मुद्दा उपस्थित झाला असल्याची माहिती शशीधर कुरेर यांनी दिली.
महापालिकेने फेरीवाल्यांना हटविले नसल्यानेच सदर जागेवर फेरीवाले आपला हक्क सांगत आहेत. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे सांगितले. याबाबत आवश्यक कारवाई न केल्यास एक दिवस महापालिका कार्यालय आवारातच फेरीवाले आपला व्यवसाय थाटतील, अशी सूचना कुरेर यांनी बैठकीत केली. कोटय़वधी निधी खर्च करून स्मार्ट सिटी कंपनीकडून विकासकामे राबविण्यात येत आहेत. हे काम संपल्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीची जबाबदारी संपणार आहे. त्यामुळे देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकेची असणार असून हे विसरून चालणार नाही. पण महापालिकेचे काही अधिकारी व कर्मचारी स्मार्ट सिटीकडे बोट करून आपली जबाबदारी नसल्याचे भासवत आहेत. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱयांनी व कर्मचाऱयांनी आपली जबाबदारी ओळखून आपण जनतेसाठी कार्य करत आहोत, याचा विचार करावा, यामध्ये श्रेयवाद नसल्याचेही स्पष्ट केले.
स्मार्ट रोड बनविण्यात आलेल्या रस्त्याशेजारील कचराकुंडय़ा हटविण्यात आल्या आहेत. पण अन्य ठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचत असल्याने स्वच्छता केली जात नाही. शुक्रवार पेठ येथील रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा साचत असून उद्यानाशेजारी कचरा डेपो बनला आहे. त्यामुळे स्वच्छता करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. सर्व स्मार्ट रोड स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी महापालिकेच्या स्वच्छता विभागाची आहे. पण स्वच्छतेबाबतही स्मार्ट सिटीकडे बोट करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी कंपनीने ठिकठिकाणी गाळे बांधून महापालिकेला हस्तांतर केले आहेत. या माध्यमातून महापालिकेला महसूल मिळू शकतो. पण गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी विलंब होत असल्याने महापालिकेचेच नुकसान होत आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बसथांब्यांची उभारणी करून डिजिटल फलक बसविले आहेत. सदर बसथांब्यांच्या देखभालीसाठी निविदा काढणे आवश्यक आहे. पण महापालिकेकडून कोणतीच कार्यवाही झाली नाही. स्मार्ट बसथांब्यांची स्वच्छताही करण्यात येत नाही. स्मार्ट बसथांबे निर्माण करण्याची जबाबदारी स्मार्ट सिटी कंपनीची आहे. पण याची देखभाल करणे व त्यातून मिळणारा महसूल घेणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. मात्र याबाबत महापालिकेच्या अधिकाऱयांना कोणतेच गांभीर्य नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱयांनी व कर्मचाऱयांनी याबाबत गांभीर्याने विचार करून नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन शशीधर कुरेर यांनी केले.
अधिकाऱयांनी आपल्या जबाबदाऱया ओळखून काम करावे : मनपा आयुक्त
पथदीप देखभालीबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. महापालिकेने कोणत्या जबाबदाऱया पार पडण्याची गरज आहे याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागाच्या अधिकाऱयांना सूचना करण्यात आल्या. महसूल विभागासह स्वच्छता विभाग, पथदीप देखभाल आदींसह सर्व विभागांच्या अधिकाऱयांनी आपल्या जबाबदाऱया ओळखून काम करावे, अशी सूचना महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी केली. नव्याने करण्यात आलेल्या फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्याची सूचना आयुक्तांनी केली.
यावेळी महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर, आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते हणमंत कलादगी, साहाय्यक कार्यकारी अभियंते महांतेश नरसण्णावर आदींसह मनपा व स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.