स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी
प्रतिनिधी / सातारा
शासनाने आचारसंहिता आणि कोरोना पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा ते कराड आक्रोश मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली. कायदा व सुवस्था यामुळे हा मोर्चा काढता येणार नसल्याची भूमिका पोलीसांनी घेतली. यामुळे हा मोर्चा रद्द करण्यात आला आहे. त्याच बरोबर पोलीसांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकाऱयांनी येत्या 5 डिसेंबरला वेगवेगळया मागण्याच्या संदर्भात बैठक लावली आहे. जिह्यातील शेतकरी या साखर सम्राट कारखानदारांच्या दबावाखाली दबला आहे. 2013 साली कराडला रणसंग्राम करून शेतकऱयांना न्याय मिळवून दिला. त्यांची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी लक्षात ठेवावा की, कराडमध्ये आम्ही येवू नये असे वाटत असले. तर त्यांनी एक रक्कमी एफआरपी तातडीने देण्याचा आदेश द्यावा सातारा जिह्यातील साखर कारखानदरांना. नाहीतर 5 तारखेनंतर रणसंग्राम होवून ऊसाचे दांडके हातात घेवू असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी सांगितले.
राजु शेट्टी म्हणाले, विशेषत: सातारा जिह्यातील साखर कारखान्यांनी अद्यापी एक रक्कमी एफआरपी देण्यासंदर्भातील एक वक्तव्य केलेले नाही. साखर कारखाने तर चालु आहेत. यावेळीच्या ऊस परिषदेमध्ये आम्ही सबुरीची भूमिका यासाठी घेतली. कोरोनाच्या काळामध्ये दुधासाठीचे आंदोलन केले, मोचे काढले. त्या मोर्चेमध्ये 12 ऑगस्टचा मोचा जो बारामतीमध्ये झाला त्या मोर्चातील 53 कार्यकर्त्यांना कोरोनाची बाधा झाली. यातील तीन कार्यकर्ते आज हयात नाहीत. यांचा फटका बसल्याने यंदा ऊस परिषद ऑनलाईन घेतली. त्यावेळी अशी भूमिका घेतली की, आम्हाला आंदोलन करण्याची वेळ सरकारने व कारखानदारांनी आणू नये जो कायदा आहे. त्या कायद्यानुसार एफआरपी रक्कम विना कपात द्यावी. आणि 200 रूपये सिझन संपल्यावर द्यावी. अशी भूमिका घेतली असतानाही केवळ कोल्हापुर, सांगली जिह्यातल्या 55 साखर कारखान्यांनी भूमिका मान्य केली. सातारा जिह्यातील फक्त एकच कारखान्यानी रक्कम देण्याचे मान्य केले. बाकीच्या कारखानदरांनी आपली भूमिका मान्य केलेली नाही. त्यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आलेला. 25 तारखेला स्व. यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे. महाराष्ट्रातील मोठे नेते त्यांना आदराजंली वाहण्यासाठी प्रितीसंगमावर येतात. पण या सातारा जिह्यातल्या शेतकऱयांची अवस्था काय आहे. हे त्यांना कळावे. म्हणून आम्ही गांधीवादी भूमिकेतून पायी आत्मक्लेश आंदोलन करत हा मोर्चा काढायचे ठरवले होते. मात्र पोलीसांनी अशी भूमिका घेतली की, 25 तारखेला आलेल्या नेत्यांबरोबर तुम्हाला चर्चा करण्याची संधी उपलब्ध करून देवू. कोरोनामुळे असे मोर्चा काढल्यास जीवघेणी ठरू शकते म्हणून आम्ही ती मान्य केली. 25 तारखेला आमच्या मागण्याचे निवेदन सर्वच नेत्यांना दिले जाईल. 5 डिसेंबरच्या बैठकीत काय होतयं हे आम्ही बघु, पण या बैठकीत निर्णय झाला नाही तर या मोर्चात इशारा देते की कराड ही पुढची रणभूमी ठरणार आहे. साताऱयात पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने मोर्चा काढून पुडील मोर्चा रद्द करण्यात आला.