प्रतिनिधी/ सातारा
शहरातील अनेक ठिकाणचे मार्ग किंवा भिंती या अत्त्यंत दुर्लक्षित असतात. काही भिंतींवर तर पान, गुटखा, तंबाखु सारख्या पदार्थांचे सेवन करून वारंवार थुंकुन घाण केल्या जातात. तसेच अनेक ठिकाणी तर कचऱयाचेच साम्राज्य पसरलेले असते. याचीच दखल घेत ढोर गल्ली (गुरूवार पेठ) येथील भिंतींना नाविण्यपुर्ण पध्दतीने उजाळा देण्यात आला आहे.
सध्या भिंती या परिसरातुन ये-जा करणाऱया सर्वच नागरिकांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे. येथील भिंतींना अत्याधुनीक प्रकारचे ऑईलपेंट लाऊन उजाळा देण्यात आला आहे. याअंतर्गत विविध सामाजिक संदेश ही देण्यात आले आहेत. तसेच महात्मा गांधीजी, बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेमहाराज, अणाभाऊ साठे, सावित्रीबाई व ज्योतिराव फुले, विठु माऊली आदींच्या रेखाकृतीही विविध संदेश देत उमटविल्या आहेत.
ढोर गल्लीतील मुंलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, येथील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटावे, व देशातील महनीय व्यक्तींबद्दल माहिती व्हावी, या उद्देशाने या भिंतींची रंगरंगोटी करण्यात आली आहे. यामुळे येथील परिसर आणखीनच आकर्षक बनला आहे. तसेच परिसरातील नागरिकांतर्फे ही समाधान व्यक्त करण्यात येत आहे. येथील नगरसेवक बाळू खंदारे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला आहे.