बस आगार प्रमुखांना घेराव : मराठी भाषिक नेत्यांनी विचारला जाब : खानापूर तालुक्यात अपुऱया बससेवेचा विद्यार्थ्यांना बसतोय फटका
वार्ताहर /खानापूर
खानापूर तालुक्यात बससेवा सुरळीत नसल्याने अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. तालुक्याच्या प्रत्येक गावापर्यंत बस सुविधा पोहोचवणे बस आगाराची जबाबदारी आहे. परंतु चालक व वाहकांची कमतरता असल्याचे कारण सांगून अनेक गावांना बस सुविधा नसल्याने शालेय विद्यार्थ्यांची गळचेपी होत आहे. शालेय वेळांच्या काळात बससेवा नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना खासगी वडाप वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. अनेकवेळा निवेदने देऊनही तालुक्मयातील प्रमुख मार्गांवर बससुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. यासाठी बससेवा सुरळीत करण्यात यावी, अशी मागणी शालेय विद्यार्थ्यांसह खानापुरातील विविध मराठी भाषिक संघटनांच्यावतीने खानापूर बस आगार प्रमुख आनंद शिरगुप्पीकर यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी नागरगाळी, हलशी या भागातील विद्यार्थ्यांनीही या ठिकाणी बसच्या मागणीसाठी गर्दी केली होती. नागरगाळी येथून सकाळी 7 वाजता एकच बस आहे. परंतु या भागातून शेकडो विद्यार्थी नंदगड व खानापूरला माध्यमिक विद्यालयांसह कॉलेजसाठी येतात. पण एकच बसमध्ये तुडुंब विद्यार्थी भरून येत आहेत. त्यामुळे हलशीजवळ विद्यार्थ्यांसाठी सदर बस थांबत नाही. त्यामुळे या मार्गावर बस सुविधा असूनही अनेक विद्यार्थ्यांना खानापूरला कॉलेजला येण्यासाठी सुविधा नाही. यासाठी नागरगाळी मार्गावर सकाळच्या वेळेत दोन बसेस सोडण्यात याव्यात, तसेच शाळेच्या वेळापत्रक कालावधीमध्ये बससेवा नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे बससेवा सुरळीत करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांनी केली.
यावेळी खानापूर तालुका युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, शिवसेनेचे राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील, मराठी सांस्कृतिक प्रति÷ानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, चापगाव ग्राम पंचायतचे माजी अध्यक्ष रमेश धबाले, हारुरी माजी ग्राम पंचायत सदस्य मऱयाप्पा पाटील, युवा समितीचे ज्ञानेश्वर सनदी, राजू पाटील, अनिल बेळगावकर यांसह ग्रामीण भागातील शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते.
जादा बसेसची मागणी
यावेळी आगार प्रमुखांनी प्रत्येक गावापर्यंत बससेवा पोहोचवण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. आणखी पाच ते सहा बसेसची मागणी वरि÷ांकडे केली आहे. त्याची पूर्तता होताच सर्व गावांपर्यंत सुविधा मिळतील, असे त्यांनी सांगितले.
हेम्माडगा भागातही बससेवा अपुरी….
हेम्माडगा भागातील दुर्गम गावांनाही बससेवा अपुरी आहे. यामुळे विद्यार्थीवर्गाची परवड होत आहे. यासाठी राज्य परिवहन मंडळाने खानापूर बस आगाराचा लवकरात लवकर विस्तार करून अधिक बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच तालुक्मयाच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेता विद्यार्थ्यांचे प्रतिनिधीत्व करत खानापूर तालुक्मयातील विविध मराठी भाषिक संघटनांच्या नेत्यांनीही खानापूर बस आगाराच्या विस्ताराचा मुद्दा, तसेच खानापूर तालुक्मयात आवश्यक सुविधा यासंदर्भात प्रदीर्घ चर्चा करून त्या त्वरित सोडविण्यात याव्यात, अशी मागणी केली.