योग्यप्रकारे नियोजन करण्याकडे तालुका पंचायत अभियंत्यांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव
तालुका पंचायतमधील अभियंते असून अडचण नसून खोळंबा, अशी गत झाली आहे. ते कोणत्याही बैठकीला उपस्थित राहत नाहीत. त्यांच्या मनमानी कारभारामुळे तालुक्मयातील अनेक कामे रेंगाळली आहेत. काही अभियंते तर एका लोकप्रतिनिधीसाठीच काम करत आहेत. त्यांच्या कारभारामुळे त्यांची चांगलीच फजिती होणार आहे. हे अभियंते ता. पं. सदस्यांसाठी काम करतात की संबंधित लोकप्रतिनिधीच्या उसाबरी करण्यात धन्यता मानतात, असा सवालही यावेळी उपस्थित करून अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले.
विकासाच्या नावावर भकासाचे राजकारण करणारे अभियंते कामाकडे दुर्लक्ष करत आहेत. कोणत्याही सदस्यांनी फोन अथवा कामासाठी बोलाविले तर टाळण्यातच धन्यता मानत आहेत. सध्या आपला कार्यकाळ संपत आला आहे तर 15 व्या वित्त आयोगातून मंजूर झालेला निधी योग्यप्रकारे नियोजन करण्याकडे तालुका पंचायत अभियंत्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी सर्व सदस्यांनी यावेळी केली.
तालुका पंचायतमध्ये अभियंते म्हणून नांजरे व पाटील हे आहेत. मात्र त्यांचे तालुका पंचायतमधील सदस्यांच्या कामांकडे दुर्लक्ष होत आहे. वारंवार सांगूनही त्यांनी आपल्या वागण्यात सुधारणा केली नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात ठरावही संमत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागील अनेक महिन्यांपासून तालुका पंचायतमधील अभियंत्यांनी कामाकडे दुर्लक्ष करून सदस्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे.
तालुका पंचायतमधील काही वरि÷ अभियंते तर एका लोकप्रतिनिधीच्या कामासाठीच नेमण्यात आले आहेत. त्यामुळे हे सरकारचे नोकर आहेत की लोकप्रतिनिधींचे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. एका भाजप लोकप्रनिधींच्या नावे अनेकांची कामे न करण्याकडेही त्यांनी वरचष्मा केला आहे. मात्र, यापुढे असे घडल्यास त्यांची गय केली जाणार नाही, असेही काही सदस्यांनी ठणकावून सांगितले. आपला कार्यकाळ अवघ्या दोन-तीन महिन्यांत संपणार आहे. त्यामुळे तातडीने तालुक्मयातील अर्धवट कामे पूर्ण करून नागरिकांच्या उपयोगात आणावीत, अन्यथा यापुढे आम्ही गप्प बसणार नाही, असे त्यांना सुनावण्यात आले.
यावेळी तालुका पंचायत अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांनीही अभियंत्यांची कानउघाडणी केली. यावेळी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, उदय सिद्दण्णावर, नारायण नलवडे, काशिनाथ धर्मोजी, नीना काकतकर, मधुरा तेरसे, लक्ष्मी मेत्री, यल्लाप्पा कोळेकर, महांतेश अलाबादी, भीमा नाईक यांच्यासह इतर सदस्यांनी अभियंत्यांची चांगलीच खरडपट्टी काढली..