30 रोजी कोल्हापूर येथे होणाऱया धरणे आंदोलनात सहभागी व्हा : काळय़ादिनी कडकडीत हरताळ पाळा
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने 1 नोव्हेंबर काळादिन मराठी भाषिकांनी गांभीर्याने पाळावा, तसेच कडकडीत हरताळ पाळावा, त्याचप्रमाणे शनिवार दि. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 4 पर्यंत दसरा चौक कोल्हापूर येथे सीमाप्रश्नी महाराष्ट्राचे लक्ष वेधण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने धरणे आंदोलन आयोजित केले आहे. त्यामध्ये देखील समिती कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करणारे पत्रक खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने काढण्यात आले आहे.
सोमवारी खानापूर शहरात पदयात्रा काढून पत्रकाचे वितरण करण्यात आले. सर्वांनी 1 नोव्हेंबर काळय़ादिनी कडकडीत हरताळ पाळावा, तसेच 30 ऑक्टोबर रोजी सीमाप्रश्नासाठी कोल्हापूर येथे होणाऱया धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले.
या पदयात्रेत तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, चिटणीस आबासाहेब दळवी, महादेव घाडी, विवेक गिरी, जयराम देसाई, प्रकाश चव्हाण, नारायण लाड, विठ्ठल गुरव, रुक्माण्णा झुंजवाडकर, डी. एम. गुरव, रमेश देसाई, शिवाजी पाटील, कृष्णा मन्नोळकर, मुरलीधर पाटील, नारायण पाटील, बी. बी. पाटील, रवि पाटील, शंकर गावडा, मऱयाप्पा पाटील, ईश्वर बोबाटे, डी. एम. भोसले, मल्हारी खांबले, संदीप पाटील व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.