दिनांक 1 ते 8 सप्टेंबर 2021
गणेश चतुर्थी संदर्भात थोडेसे महत्त्वाचे
येत्या शुक्रवार दि. 10 रोजी श्री गणेश चतुर्थी आहे. त्यासंदर्भात अनेकांच्या मनात अनेक शंकाकुशंका आणि प्रश्न उद्भवतात. त्यासंदर्भात थोडक्मयात विवेचन येथे केलेले आहे. त्यादिवशी संपूर्ण दिवसभर चतुर्थी आहे. त्यामुळे केव्हाही मूर्ती आणण्यास हरकत तरीही दुपारी बाराच्या आत आणता आल्यास उत्तम. सोयर-सुतक अथवा तत्सम काही कारणाने त्या दिवशी गणपती मूर्ती आणता येणे शक्मय नसेल तर नंतर आपल्या सोयीप्रमाणे आणू नये, कारण चतुर्थीचे महत्व इतर तिथींना येत नाही. एक वर्ष खंड पडला म्हणून काहीही संकट येत नाही. पूर्वीच्या काळी चतुर्थीला पहाटे मातीची गणपती मूर्ती तयार करून तिची शास्त्राsक्त पूजा अर्चा करून त्याच दिवशी विसर्जन करीत असत. ती खरी प्रथा आहे. पण हल्ली दीड, पाच, सात आणि दहा-अकरा दिवस गणपती ठेवून पूजा करतात. त्यामागे केवळ हौस हेच कारण आहे. गणपती हा एकच असतो. त्याचा वेगळा, तुमचा वेगळा असे काही नसते. कुठेही नमस्कार केला तरी तो त्याला पोहोचतो. गणपती आणणे शक्मय नसेल तर सार्वजनिक गणपतीला फळफळावळ नैवेद्य दिल्यास चालते. गणपती मूर्ती जास्तीत जास्त 9 इंच किंवा आपल्या हाताच्या वीती एवढी असावी फार मोठी मूर्ती आणू नये. मूर्ती आणताना घाईगडबडीत धक्का वगैरे लागून मूर्ती भंगण्याची शक्मयता असते, पण जोपर्यंत मूर्तीची प्राणप्रति÷ा होत नाही तोपर्यंत त्याला कोणताही दोष नसतो. त्यातही पूजा झाल्यानंतर जर मूर्ती भंगली तर तिची क्षमा मागून ती मूर्ती पाण्यात विसर्जित करावी. दुसरी मूर्ती आणू नये, काहीजण भयानक भीती घालतात. अमुक तमुक शांती करा, असे सांगून खर्चात टाकतात. त्यादिवशी अथर्वशीर्षाला महत्त्व आहे, ज्यांना शक्मय आहे त्यांनी कमीत कमी एकवीस आवर्तने तरी त्या दिवशी अवश्य करावीत. त्यामुळे गणेशाची कृपा राहील व कोणतेही अपशकुन घडले तरी त्याचा दोष लागत नाही. जोपर्यंत घरात मंगलमूर्ती आहे तोपर्यंत सर्व तऱहेने पावित्र्य पाळावे. काही ठिकाणी ?दुसऱया दिवशी उंदीरबीच्या नावाने मांसाहाराचा नैवेद्य दाखविला जातो ही प्रथा अत्यंत गलिच्छ तिरस्करणीय आणि निंद्य आहे. मांसाहार अथवा इतर कारणाने मंगलमूर्तीचे पावित्र्य भंग झाल्यास त्याचा मोठा दोष लागतो व त्याचे परिणाम कसे होतील ते सांगता येणार नाही.
मेष
श्री गणेशाचे आगमन तुमच्या राशीच्या सप्तमस्थानी होत आहे भागीदारी व्यवसाय आणि विवाह संदर्भातील सर्व अडचणी दूर होतील. मनाप्रमाणे सर्व कामे होऊ लागतील. गणेशाचे कोणतेही स्तोत्र त्यादिवशी जास्तीतजास्त वाचण्याचा प्रयत्न करा. तुमचे अनेक प्रश्न सुटतील आणि मनाला शांती मिळेल. जर नोकरी-व्यवसायाच्या प्रयत्नात असेल तर तेदेखील काम होऊन जाईल.
वृषभ
मंगलमूर्तीचे आगमन तुमच्या राशीच्या ष÷स्थानी होत आहे. आरोग्याच्या काही तक्रारी असतील. मामा, मावशी व तत्सम मातृपक्षाशी काही मतभेद असतील, नातेवाईकांशी संबंध वगैरे बिघडलेले असतील तर या समस्येवर गणेश निश्चितच काहीतरी मार्ग दाखवील. त्यासाठी या चतुर्थीला गणेशाचे कोणतेही स्तोत्र जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करा. बऱयाच जटील समस्या मिटतील व मनासारखी कामेही होऊ लागतील.
मिथुन
ग्रहमान अनेक बाबतीत अनुकूल आहे मनातील इच्छा पूर्ण होतील मानसिक समाधान लाभेल. तुमच्या कलागुणांना चांगले प्रोत्साहन मिळेल. शुक्राचे भ्रमण मोठय़ा प्रमाणात धनलाभ घडविण्याची शक्यता दिसते. गणेशाचे आगमन पंचमस्थानी होत आहे. शिक्षण, विद्या, संततीप्राप्ती विवाह, दैवी आपत्ती याबाबत ज्या काही समस्या असतील त्या गणेशपूजनाने दूर होतील. तुम्हाला येणारे कोणतेही गणेशस्तोत्र त्यादिवशी एकवीस वेळा वाचा. त्याचा अनुभव एक वर्षापर्यंत येईल.
कर्क
शुक्राचे भ्रमण सर्व अनुकूल आहे. जमीन-जुमला संदर्भातील सर्व कामे होतील. सुखाची नवनवीन साधने खरेदी कराल. वडिलांकडून एखादा उद्योग सुरू करण्यासाठी सहकार्य मिळेल. सरकारी कामे पटापट होतील. सामाजिक क्षेत्रात असाल तर नावलौकिक होईल. गणेशाचे आगमन चतुर्थस्थानी होत आहे. घर, जागा, वाहन यासंदर्भातील कोणत्याही इच्छा पूर्ण होण्यास अनुकूल काळ.
सिंह
तृतीयात बलवान शुक्र आहे. एखादे मोठे साहस हाती घेऊन ते पूर्ण कराल. अपेक्षेपेक्षा अधिक मोठे धनलाभाचे योग, सरकारकडून येणे असलेली बिले वसूल होतील. आणि नवीन कंत्राटे मिळतील. नावलौकिक होईल. उद्योगव्यवसायात चांगली प्रगती सुरू होईल. मानसिक स्थिती उत्साही राहील. गणेशाचे आगमन तुम्हाला सर्व कार्यात मोठे यश देणारे आहे. सर्व तऱहेचे पावित्र्य पाळून. गणेशस्तोत्र वाचा सर्व कामे होतील.
कन्या
धनस्थानी उच्च शुक्र असल्याने आर्थिक स्थिती भक्कम राहील. कोणतेही काम करा त्यातून मोठय़ा प्रमाणात पैसा मिळत जाईल. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यास हरकत नाही. काही व्यवहारी गणिते या आठवडय़ात बरोबर जमतील. त्यामुळे नवीन कल्पना अमलात आणू शकता. गणेशाचे आगमन धनस्थानी होत आहे. आर्थिक अनुकूल काळ आहे. त्याचे परिणाम वर्षभर टिकतील.
तूळ
राशीस्वामी शुक्र उच्च आहे. तुमचे व्यक्तिमत्व आनंदी आणि आकर्षक बनविल. शिवाय तुमच्या राशीतच गणेशाचे आगमन होत आहे. हा एक प्रकारचा अतिशय भाग्यवान योग म्हणता येईल. आरोग्य सुधारणा, आर्थिक भरभराट, कोर्ट प्रकरणात अपेक्षित यश मिळणे, शिक्षणातील अडथळे दूर होणे. विवाहात येणारे अडथळे दूर होणे अशा चांगल्या गोष्टींचा यात समावेश असेल
वृश्चिक
बाराव्या स्थानी उच्च शुक्र आणि त्याच ठिकाणी गणेशाचे आगमन हा आध्यात्मिक अनुभूती आणि आर्थिक सुबत्ता देणारा चांगला योग आहे. नवे काहीतरी शिकण्यास मिळेल जर कुणाला तारण वगैरे न घेता पैसे दिले असतील तर ते आपोआप वसूल होतील. काही गोष्टी मात्र गुप्त ठेवणे आवश्यक आहे. अत्यंत जवळचे अथवा खास व्यक्तींनादेखील आर्थिक कमाईचे मार्ग सांगू नका. त्याचा दुरुपयोग होईल.
धनु
यापूर्वी जर महत्त्वाच्या कामासाठी प्रयत्न केलेला असाल तर लाभस्थानी असलेला उच्च शुक्र सर्व काही सहज आणि आरामात मिळवून देईल. धनलाभ, वाहन, घरदार, आनंदी वातावरण, चेहऱयावर तेज वाढणे, गोष्टींचा त्यात समावेश असेल येथेच श्रीगणेशाचे आगमन होणार असल्याने शिक्षणात उत्तम यश मिळवाल. विवाहाच्या वाटाघाटी यशस्वी होतील. नव्या नोकरीचे कॉल येऊ शकतील. जर तुमच्याकडे कलात्मकता हुशारी आणि बुद्धिमत्ता असेल तर या ग्रहांवर जीवनाचे सोने करू शकाल.
मकर
दशमस्थानी उच्च शुक्र म्हणजे जीवनात ऐशआराम आणि सर्व इच्छा पूर्ण होण्याचा संकेत म्हणता येईल. काही कारणाने रखडलेला विवाह होऊन जाईल. नोकरी-व्यवसायात उत्साही वातावरण राहील. मुलाबाळांच्या बाबतीत शुभ घटना. वाहन, घरदार, रंगरंगोटी, आकर्षक रचना, यासाठी बराच खर्च कराल. यावषीचे गणेशपूजन तुम्हाला आगामी वर्षभर नोकरीविषयक चांगले फळ देत राहील. मातापित्यांच्या बाबतीत देखील शुभ घटना घडतील.
कुंभ
भाग्यस्थान हे अति शुभ. तेथेच उच्च शुक्राचे वास्तव्य आणि त्याला गणेशाची साथ. हा योग सर्व दृष्टीने जीवनात मंगल घडवेल. शुभ कार्यासाठी प्रवास, नोकरी-व्यवसायात बढती-बदली तसेच काहीजणांना परदेशी जाण्याचा योगदेखील येईल. वाहन शिकणे आणि खरेदी विक्रीसाठी अनुकूल काळ आहे. पूर्वापार चालत आलेले शत्रुत्व कमी होईल. दुरावा कमी झाल्याने नातेवाईक चांगले वागू लागतील.
मीन
अष्टमस्थानी उच्च शुक्र व तेथेच गणेशाचे आगमन हा योग धनप्राप्तीसाठी चांगला आहे. जर हाती पैसा टिकत नसेल तर आतापासूनच पैसे राखून ठेवण्यास सुरुवात करा. कोणतेही आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. वैवाहिक जोडीदाराच्या पायगुणामुळे प्रगती होत राहील. जीवनातील सर्व नकारात्मकता कमी होऊन स्वभाव आनंदी व उत्साही राहील. छंद किंवा हौस म्हणून केलेले एखादे काम मोठे चांगले फळ देऊन जाईल.