1973 पूर्वीच्या सफाई कर्मचाऱयांच्या कुटुंबांना घरे दिली जाणार ः 40 कर्मचाऱयांची यादी तयार : जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
सफाई कर्मचाऱयांना तातडीने घरे द्यावीत, यासाठी सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱयांकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱयांनी मंगळवारी बैठक घेतली. यावेळी 40 सफाई कर्मचाऱयांची यादी तयार करण्यात आली. त्यामधील 10 कर्मचाऱयांना तातडीने घरे दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सफाई कर्मचारी संघटनेला दिली.
यावेळी 1973 पूर्वीच्या सफाई कर्मचाऱयांच्या कुटुंबांना घरे दिली जाणार आहेत, असे सांगितले. त्यावर सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी हुबळी, रायचूर तसेच इतर जिह्यांमध्ये 2006 मध्ये काम केलेल्या कुटुंबीयांनाही घरे मंजूर करण्यात आली आहेत. तेंव्हा सर्वांनाच घरे द्यावीत, अशी मागणी केली. त्यावर सरकारकडे पाठपुरावा करून निश्चितच याबाबत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन देण्यात आले.
आनंदवाडी-शहापूर येथील पी. के. क्वॉर्टर्स, आझमनगर, नेहरूनगर परिसरात एकूण 253 कुटुंबांना घरे दिली आहेत. त्यांना तेथेच राहण्यासाठी हक्कपत्रे द्यावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी रुक्मिणीनगर येथील जागेची हक्कपत्रे अनेक सफाई कर्मचाऱयांच्या कुटुंबाकडे आहेत, ती परत करावीत, असे सांगितले.
एका कुटुंबाला एक घर याप्रमाणे सरकारने ही योजना राबविली आहे. मात्र, अनेक कुटुंबे पी. के. क्वॉर्टर्समध्ये राहतात आणि हक्कपत्रेही घेतली आहेत, असे सांगितले. त्यावर सफाई कर्मचारी संघटनेचे दीपक वाघेला आणि विजय निरगट्टी यांनी या सर्व कुटुंबांना विश्वासात घेणे महत्त्वाचे आहे. कारण त्यांच्या मनामध्ये हक्कपत्र दिले तर येथूनही आम्हाला बाहेर काढण्याची शक्मयता आहे. तेंक्हा प्रत्यक्ष येऊन त्या कुटुंबांचे म्हणणे ऐकून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, असे त्यांनी सांगितले.
बैठकीला महापालिका आयुक्त रुदेश घाळी, आरोग्य अधिकारी संजीव डुमगोळ, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांच्यासह बिम्सचे अधिकारी उपस्थित होते.
मैलावाहू कुटुंबांच्या सर्व्हेमध्ये तफावत
मैलावाहू कुटुंबांचा सर्व्हे झाला असला तरी अजूनही त्यामध्ये बरीच तफावत आहे. त्यामुळे योग्यप्रकारे छाननी करावी, अशी मागणी सफाई कर्मचाऱयांनी केली आहे. मैलावाहू कुटुंबे अनेक आहेत. सध्या ते काम करत नसले तरी यापूर्वी त्यांनी काम केले आहे. त्यांना ओळखपत्रे द्यावीत, अशी मागणी दीपक वाघेला यांनी केली.