काही दिवसांमध्ये स्थिती मूळ पदावर येणार, भारताकडून पडताळणीनंतर दुजोरा,
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लडाख येथील भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आणखी काही भागांमधून चीनने माघार घेतली आहे. यात उष्ण झऱयांचा (हॉट स्प्रिंग्ज्) प्रदेशाचाही समावेश आहे. चीनच्या प्रत्येक हालचालींवर भारताने बारकाईने लक्ष ठेवले आहे. आतापर्यंत माघार घेतली गेलेल्या भागांची पडताळणी करून भारतानेही माघारीच्या वृत्ताला दुजोरा दिला. येत्या काही दिवसांमध्ये दोन्ही देशांमधील स्थिती पूर्वपदावर येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
उष्ण झऱयांच्या आणि पँगाँग सरोवर प्रदेशातील नियंत्रण रेषेवरून मंगळवारी चीनने सैनिक मागे घेतले. त्याचबरोबर या भागातील आपले तंबू आणि इतर बांधकामेही काढून घेतली. चीनी वाहने मागे जात आहेत. साधारणतः चीनी सैनिक 3 ते 4 किलोमीटर मागे गेले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
1.5 किलोमीटर मागे
दोन्ही देशांच्या सेनाधिकाऱयांमध्ये 30 जूनला झालेल्या करारानुसार सीमेवरील सर्व संघर्ष बिंदूंवरून दोन्ही देशांचे सैनिक 1.5 किलोमीटर मागे गेले आहेत. भारतानेही गालवन खोऱयातील नियंत्रण रेषेवरून आपले सैनिक दीड किलोमीटर मागे घेतले आहेत. दोन्ही सेनांमध्ये किमान 3 किलोमीटर अंतर रहावे, असे ठरविण्यात आले आहे. मात्र चीनी सैनिक काही ठिकाणी याहीपेक्षा जास्त मागे गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याला दुजोरा मिळणे आवश्यक आहे.
भारतीय सैन्य सज्ज, सावध
चीनने सीमेवरून माघार घेण्यास प्रारंभ केला असला तरी भारताने चीनवर अंधळघ् विश्वास न टाकता आपल्या बाजूने पूर्ण सज्जता ठेवली आहे. चीनच्या प्रत्येक हालचालीवर पूर्णतः लक्ष ठेवण्यात येत आहे. जमिनीवरून आणि आकाशातूनही टेहळणी करण्यात येत आहे. भारताची अनेक लढाऊ विमाने सीमारेषेवर अहोरात्र घिरटय़ा घालत असून लक्ष ठेवत आहेत.
गालवन खोऱयातील माघार पूर्ण
गालवन खोऱयातील 14 व्या बिंदूपासून माघार घेण्याची प्रक्रिया चीनने पूर्ण केल्याचे भारतानेही स्पष्ट केले आहे. याच बिंदूपाशी 15 जूनच्या मध्यरात्री दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती. त्यात 20 भारतीय सैनिक आणि चाळीसहून (काही तज्ञांच्या मते 50 हून) अधिक चीनी सैनिक ठार झाले होते. याच स्थानी भारतीय सैनिकांनी चीनच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना पराक्रमाची शर्थ केली होती. या पराक्रमाचा मोठा दबाव चीनवर आला होता.
पँगाँगमधून अंशतः माघार
सोमवार व मंगळवार या दोन दिवसांमध्ये लडाखच्या पँगाँग त्सो (सरोवर) प्रदेशातील सीमारेषेवरून चीनने अंशतः माघार घेतली आहे, असे भारतीय सेनेच्या सूत्रांनी म्हटले आहे. येथील फिंगर 4 च्या प्रदेशात अजूनही चीनचे काही तंबू व बांधकामे असून ती काढून घेण्यासाठी भारताने आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र कोणत्याही भागात चीनने भारतीय सीमा ओलांडून आत प्रवेश केलेला नव्हता असाही खुलासा सेनेच्या सूत्रांनी पत्रकारांकडे केला आहे.
साशंकता राहणारच
दिलेला शब्द न पाळण्याची चीनची खोड लक्षात घेता गेल्या दोन दिवसांमधील माघार स्थायी असेल का यावर सेनेचे निवृत्त अधिकारी रास्त शंका व्यक्त करीत आहेत. गेल्या दोन दिवसांमधील चीनची माघार केवळ ‘बेबी स्टेप्स’ (छोटी पावले) या स्वरूपातील आहे. त्यामुळे भारताने अंखड सावध राहून आपल्या टेहळणी क्षेत्राचे संरक्षण केले पाहिजे, अशी महत्वाची सूचना या अधिकाऱयांनी केली आहे. दिल्लीतील सरकारी अधिकाऱयांचेही हेच म्हणणे आहे.
चीनकडूनही दुजोरा
चीनच्या विदेश विभागाचे प्रवक्ते झाओ लिजान यांनी सेनामाघारीला दुजोरा दिला. दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली असून प्रयत्नांना यश येत असल्याचा दावा त्यांनी केला. उष्ण झऱयांच्या प्रदेशातील टेहळणी बिंदू 14, 15 आणि 17 येथूनही आता चीनी सेना माघारी गेली आहे.
भारताला भक्कम पाठिंबा
अमेरिका भक्कमपणे भारताच्या पाठीशी आहे, असे आश्वासक उद्गार व्हाईट हाऊसच्या अधिकाऱयाने काढले आहेत. चीनच्या विस्तारवादाला आवर घालण्यासाठी आणि दक्षिण आशिया तसेच दक्षिण चीन समुद्रातील बळसमतोलासाठी भारताचे सहकार्य आवश्यक असल्याचे अमेरिकेने अनेकदा स्पष्ट केले असून त्या दिशेने प्रागती झाली आहे. लडाखच्या संघर्षाच्या काळात अमेरिकेने युरोपातील सैन्य कमी करून आशियात नियुक्त करू अशी घोषणा केली होती. तसेच दक्षिण चीनी समुद्रात तीन विमानवाहू नौकाही पाठविल्या होत्या. या साऱया घडामोडींचा परिणाम चीनवर होऊन त्या देशाने काहीशी नरमाईची भूमिका घेतली हे स्पष्ट आहे.
तणाव निवळण्याचा प्रारंभ ?
ड सैनिक माघारीमुळे तणाव निवळण्यास साहाय्य होणार
ड मात्र, सावधानता आणि सज्जता भारतासाठी अनिवार्य
ड दोन्ही देशांच्या सेनांमध्ये 3 किलोमीटर अंतर राखणार ड दोन्ही देशांच्या सेनाधिकाऱयांमध्ये सातत्याने चर्चा होणार