काळय़ा तांदळाच्या उत्पादनाचा पहिलाच प्रयोग : शेतकऱयांत कुतूहल : आरोग्यासाठी उत्तम असल्याने दर अधिक
प्रतिनिधी /बेळगाव
काळा भात (ब्लॅक राईस) पिकविण्याचा यशस्वी प्रयोग तालुक्यातील काही गावांमधील शेतकऱयांनी केला आहे. हा पहिल्याच प्रयोग असल्याने शेतकऱयांत कुतूहल निर्माण झाले आहे. आरोग्यास उत्तम असणाऱया काळय़ा भाताचे उत्पादन घेऊन स्थानिक शेतकऱयांनी आदर्श निर्माण केला आहे. भविष्यात या काळय़ा भाताच्या उत्पादनाकडे ओढा वाढेल, अशी अपेक्षा शेतकऱयांतून व्यक्त होत आहे.
तांदूळ म्हटलं की पहिला आठवतो तो भात. भाताचे अनेक प्रकार आपण पाहतो, त्याचा स्वादही घेतो. तालुक्मयाच्या ग्रामीण भागातील जाफरवाडी, कणबर्गी, हिंडलगा, आंबेवाडी, सांबरा आदी गावांतील शेतकऱयांनी या काळय़ा तांदळाच्या भाताचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शिवारात काळय़ा आईच्या पोटात यंदा पांढऱया तांदळाबरोबर काळय़ा तांदळाचे भात पीक डोलताना दिसले.
तालुक्मयातील काही शेतकऱयांनी यंदा प्रायोगिक तत्त्वावर काळय़ा भाताची
लागवड केली होती. त्यामुळे हा काळा भात कसा तयार होतो? आणि काळा तांदुळ कसा दिसणार? याची उत्सुकता शेतकऱयांत होती. पूर्णपणे तयार झालेल्या या भाताची कापणी करून इतर भाताप्रमाणे मळणी केली जात आहे. त्यामुळे आता शेतकऱयांच्या घरात आणि जेवणाच्या ताटात काळा भात दिसणार आहे.
पुढील वर्षी क्षेत्र वाढणार
शेतकरी आधुनिक शेतीबरोबर नवनवीन प्रयोग करत असतात. यंदा काही शेतकऱयांनी काळय़ा भाताची पेरणी केली. आतापर्यंत विविध जातीच्या तांदळाचा वापर केला जातो. मात्र, आता शेतकऱयांच्या घरात पांढऱया तांदळाबरोबर काळा तांदूळही चाखायला मिळणार आहे. याबाबत शेतकरी महिलांमध्ये या भाताबद्दल उत्सुकता वाढली आहे. या भाताची मळणी सुरू असून पुढील वषी या भाताचे क्षेत्र वाढण्याची शक्मयता आहे.
तालुक्मयातील शेतकऱयांनी पारंपरिक भात शेतीबरोबर औषधी गुणधर्म असणारा तांदुळ रुग्णांसाठी आधार ठरणार आहे. त्यामुळे याची मागणीदेखील अधिक आहे. यंदा खरीप हंगामात घेण्यात आलेल्या काळय़ा भाताचे उत्पादन हे बाजारपेठेत आकर्षण ठरणार आहे.
ग्रामीण भागात पारंपरिक दोडगा, बासमती यासह इंद्रायणी, सोनम, शुभांगी, अमन या भातपिकांचे उत्पादन घेतले जाते. यंदा प्रथमच काळय़ा तांदळाचे उत्पादन घेतले गेले. त्यामुळे आता बाजारपेठेतही काळा तांदुळ दिसणार आहे.
बियाणाचा दरही 600 रु. किलो
साधारण 110 दिवसांत येणारे हे भातपीक पोसवण्याच्या वेळी हिरव्यागार शिवारात आकर्षण ठरत होते. यंदा अवकाळी पावसामुळे याला काही प्रमाणात फटका बसला. हा काळा तांदूळ आरोग्यासाठी उत्तम असल्याने बाजारात त्याला अधिक मागणी आहे. साधारण 250 रुपये प्रतिकिलो दराने याची विक्री होते. याबरोबरच या भाताच्या बियाणाची किंमतदेखील अधिक असून प्रतिकिलो 600 रुपये दराने ते विकत मिळते, अशी माहिती भात उत्पादक शेतकऱयांनी दिली. जाफवारडी येथील शेतकऱयांनी या भाताचे बियाणे तामिळनाडू येथून मागविले असल्याचे सांगितले.
लोकप्रियता…
काळय़ा भाताची लागवड ही विशेषकरून पाणथळ शिवारात केली जाते. या भाताच्या बियाणांची किंमतदेखील अधिक असते. तालुक्मयात प्रथमच या जातीच्या भाताची लागवड शेतकऱयांनी केली आहे. खानापूर तालुक्मयातदेखील काळय़ा भाताची लागवड केली जाते. अलीकडे या भात जातीची लोकप्रियता वाढत असून भविष्यात उत्पादनात वाढ होईल.
– आर. बी. नायकर (तालुका साहाय्यक कृषी अधिकारी)
उत्सुकता…
यावषी प्रथमच काळय़ा भाताची लागवड केली होती. काळा तांदूळ कसा असतोय? याची उत्सुकता होती. इतर भाताप्रमाणे या भाताचीदेखील वाढ होते आणि उत्पादनही होते. शिवाय शिवारात या जातीच्या भाताचे उत्पादन होऊ शकते. अवकाळीचा फटका बसला असला तरी काळय़ा भाताचे उत्पादन झाले. त्यामुळे घरात काळय़ा तांदळाची चव चाखता येणार आहे.
– सुगंधा पिराजी पाटील (जाफरवाडी, महिला शेतकरी)