ओमिक्रॉन प्रभावहीन ते ओमिक्रॉन साधा सर्दी खोकला समजू नका…. किंवा तिसऱया लाटेत गंभीर रुग्ण कमीच मात्र काळजीही घ्या… अद्याप गंभीर व्हेरियंट येण्याची शक्यता… इथपर्यंत तज्ञांच्या परस्परविरोधी विधानांमुळे सर्वसामान्यांमध्ये गोंधळ उडत आहे. यासाठी कोरोनासारख्या महामारीत तरी एकाच जबाबदार व्यक्तिकडून किंवा संस्थेकडून दिशादर्शक मार्गदर्शन केल्यास किमान सर्वसामान्यांचा गेंधळ उडण्याची शक्यता कमी होऊ शकते. कारण आपण सर्वच पोटार्थी आहोत…
सध्याचे कडक निर्बंध लॉकडाऊन सदृश वाटत असल्याने सर्वसामान्यांचा गोंधळ उडत आहे. त्यातून आरोग्य संबंधित देण्यात येणाऱया इशाऱयांची खिल्ली समाजमाध्यमांवरून सुरु आहे. यातून गंभीर काय घ्यावे असा गोंधळ सर्वानुमते नोंदवला जात आहे. संपूर्ण लॉकडाऊन नकोच अशी सर्वसामान्यांची विनंती पोटार्थी असली तरी देखील सर्वसामान्यांनी दुसऱया लसीपासून दूर राहणे, गर्दी करणे, मास्क न वापरण्याकडे केलेले दुर्लक्ष पाहता कोविड वर्तणूकीचे पालन करण्यास जबाबदार यंत्रणेकडून देण्यात येणाऱया पोटतिडकीच्या आवाहनांना मात्र धुडकावले जात आहे. सर्वसामान्यांचे हे धुडकावणे महामारीबाबत करण्यात येणाऱया उलट सुलट जबाबदार व्यक्तिंच्या विधानांमुळे असल्याचे समोर येते. यात तज्ञच नव्हे तर राजकारणी देखील येत आहेत. तुम्ही मास्क लावता कि नाही, दुसरा डोस घेता की नाही कि करु लॉकडाऊन अशा केविलवाण्या चेहऱयांतून देण्यात येणारे इशाऱयांना न जुमानणाऱयांची संख्या वाढत आहे. तर दुसऱया बाजूला काही राजकीय पक्ष लस घेऊनही बाधित होत असतील तर कोरोना खोटा किंवा लस तरी खोटी अशी विधाने करत आहेत. लस घेतल्याने बाधितांमधील गंभीर होण्याचे प्रमाण कमी असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येत असून देखील लसीचे महत्व काही वक्तव्यामुळे कमी होत आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार दुसऱया देशातून झाला. विषाणूच्या व्हेरियंटचा प्रसारही दुसऱया देशातून सुरु झाला. मात्र जगभरातील सर्व शहरे संसर्गित होऊन शिक्षा भोगत आहेत. देशातील महाराष्ट्र सारख्या आणि त्यात मुंबई शहरासारखी शहरे त्याचा परिणाम अधिक भोगत आहेत. मुंबईत डेल्टा पाठोपाठ ओमिक्रॉन सहज आला. दक्षिण अफ्रिकेत आढळलेला ओमिक्रॉन व्हेरियंट हा एवढासा प्रभावशील नसल्याचे तेथील एका वैज्ञानिक बाईने सांगितल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून त्यावर तसंच विधान केले. मात्र त्यानंतर जगभरात ओमिक्रॉन व्हेरियंटचा फैलाव होऊन रुग्णसंख्या वाढली असल्याचे समोर आले. त्यावेळी हा वेगाने पसरत असलेला व्हेरियंट असे त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यापुढील पायरी म्हणजे ओमिक्रॉनने बाधित होणाऱयांची संख्या कमी असल्याने पुन्हा तो परिणामकारक नसल्याचे विधान करण्यात आले. हे सर्व सुरु असताना डेल्टा देखील सुरुच आहे. डेल्टा आणि ओमिक्रॉन अशी तुलना होऊ लागली. यात डेल्टासमोर ओमिक्रॉन कमी परिणामकारक ठरत असल्याचे तज्ञ सांगू लागले. आता डेल्टा आणि ओमिक्रॉन दोन्ही व्हेरियंट मिळून संसर्गात भर पडली तर अशी भीती तज्ञांना सतावू लागल्यावर ओमिक्रॉनला देखील महत्व देण्यात आले. दोन व्हेरियंट मिश्रित बाधा पसरु नये म्हणून सर्वसामान्यांना गंभीर इशारा देण्यास सुरुवात झाली. ‘याला साधा समजू नका गंभीर घेण्याची गरज आहे’ असे सध्या देण्यात येणारे इशारे हे आधीच्या चुकीच्या इशाऱयांची वेळेत केलेली दुरुस्ती असल्याचे स्पष्ट होते. ओमिक्रॉन हा तसा सौम्य असल्याचे तज्ञ आजही सांगत आहेत. मात्र देण्यात येणारे गंभीरपणाचे इशारे मिश्र व्हेरियंट प्रसार न होण्यासाठीच्या पार्श्वभूमीवर तत्वता खरे आहेत. गंभीर इशाऱयाची आवृत्ती म्हणजे केंब्रिज विद्यापीठाचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. गुप्ता यांनी यानंतर येणारा व्हेरियंट अतिशय धोकादायक असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यासाठी आपण सर्वांनी आतापासूनच जागरुक राहणे आवश्यक असल्याचा इशारा दिला. हा इशारा डॉ. गुप्तांकडून देण्यात येणारा गंभीर इशारा दोन दिवसांपूर्वीचा ताजा आहे. मात्र राज्य सरकार किंवा पालिका देखील या संसर्गाला घेऊन आयसीयू आणि वेंटीलेटरवर असणारे रुग्णसंख्या सारखी तपासून पाहत आहे. इथे काही गंभीर दिसून येत नसल्याने ओमिक्रॉन हा कमी जीवघेणा असल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही काळजीतून निर्बंध कडकपणे लागू करण्यात येत आहे. सरकारी यंत्रणा अगदीच निरुपयोगी गरजांना बंदिस्त करत आहे. शिवाय सध्या सुरु असलेला काळ या नव्या व्हेरियंटचा निरीक्षणाचा कालावधी असून आगामी येणाऱया व्हेरियंटच्या अभ्यासासाठी पुरक ठरु शकतो. दरम्यान कोरोनासह त्यापाठोपाठ येणाऱया सर्व व्हेरियंटला आंतरराष्ट्रीय पातळीपासून स्थानिक पालिका पातळ्यांवरील तज्ञ सर्वचजण पहिल्यांदाच सामोरे जात आहेत. त्यामुळे सद्य स्थितीनुसार प्रत्येकाच्या सुचना बदलत आहेत. मात्र एखाद्या स्वायत्त आरोग्य प्राधिकारणाने किंवा आरोग्य क्षेत्रातील एखाद्या व्यक्तिनेच जबाबदारी स्वीकारुन निर्णय देण्यास सुरुवात केल्यास महामारी आणि व्हेरियंटबाबतचा सर्वसामान्यांमधील गोंधळ नक्कीच कमी होऊ शकतो.
दरम्यान केंब्रिज विद्यापीठातील ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. गुप्तांचा इशारा देखील अतिशय मोलाचा ठरतो. आता कुठे कोरोनाचे चार व्हेरियंट आले आहेत. अजून 46 व्हेरियंट येणे बाकी आहेत. या व्हेरियंटचा परिणाम देखील त्या त्या स्थितीनुसार बदलता असू शकतो. किंवा या व्हेरियंटचे परिणाम कोणत्या स्वरुपात असतील या अंदाजापासून तज्ञही अद्याप दूर आहेत. त्यामुळे प्राथमिक कोरोना वर्तणूकीशिवाय सध्या तरी गत्यंतर नसल्याचे स्पष्ट होत आहे. सर्वसामान्यांनी हाच धडा घ्यावा. व्हेरियंटच्या फेऱयात अडकल्यास अर्थचक्र गोठण्याची मोठी शक्यता आहे. सध्या वाढणारी बाधितांची संख्या, त्यातून राज्यातील वाढणारी ऑक्सिजनची गरज, लक्षणरहित असले तरीही आयसोलेशन कालावधीत बंदिस्त राहण्याचे वैद्यकीय सल्ले हे नकोसे असेल तर प्राथमिक वर्तणुकीकडे दुर्लक्ष करुन चालणारे नाही. त्यामुळे तज्ञ डॉक्टर तसेच राज्य आणि पालिका आरोग्य विभाग देत असलेल्या सुचनांचे पालन करण्याशिवाय सध्या तरी पर्याय नसल्याचे अधोरेखित करावे लागत आहे. मात्र यासाठी कोरोनासारख्या महामारीत तरी एकाच जबाबदार व्यक्तिकडून किंवा संस्थेकडून दिशादर्शक मार्गदर्शन केल्यास किमान सर्वसामान्यांचा गेंधळ उडण्याची शक्यता कमी होऊ शकते. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीतील समाजजीवनावर गोंधळाचा प्रभाव झाल्यास देशाचे अर्थचक्र बिघडू शकते. कारण सर्वसामान्य, शहरे, राज्य आणि देश आपण सर्वच पोटार्थी आहोत.