अरविंद केजरीवाल यांची करमळी बुद्रूक येथे घोषणा
प्रतिनिधी /वाळपई
गोवा मुक्तीनंतर ते आतापर्यंत सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकीचा प्रश्न भिजत पडलेला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी राजकारण्यांनी कोणत्या प्रकारचा रस दाखविलेला नाही. मात्र त्यांच्या जमिनी नावावर करणे हा त्यांचा हक्क आहे. आम आदमी पक्षाने आतापर्यंत दिलेल्या वचनांची पूर्तता केलेली आहे. यामुळे आम आदमी पक्षाचे सरकार गोव्यामध्ये सत्तेवर आल्यास सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकीचा प्रश्न सहा महिन्यांमध्ये निकालात काढू, अशी घोषणा आपचे नेते तथा दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. सत्तरी तालुक्मयातील सावर्डे पंचायत क्षेत्रातील करमळी बुद्रूक या ठिकाणी देवस्थानाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना केजरीवाल म्हणाले की, सत्तरी तालुक्मयामध्ये जमीन मालकीचा प्रश्न गोवा मुक्तीनंतर ते आतापर्यंत प्रलंबित राहिलेला आहे. एका बाजूने जमीन मालकीचा प्रश्न तर दुसऱया बाजूने रानटी जनावरांचा उपद्रव यामुळे सत्तरी तालुक्मयातील शेतकरीबांधवांची अवस्था दयनीय झालेली आहे. या शेतकऱयांना पाठबळ देऊन त्यांचे मनोबल वाढविण्याच्यादृष्टीने आप निश्चितच सहकार्य व पाठिंबा देईल.
सत्तरी तालुक्मयातील अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या जमिनीचे प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र राजकारणाच्या जमिनी त्यांच्या नावावर कशा काय, असा सवाल यावेळी केजरीवाल यांनी उपस्थित केला.
याप्रसंगी व्यासपीठावर वाळपई मतदारसंघातील आपचे नेते सत्यविजय नाईक, पक्षाचे निमंत्रक राहुल म्हांबरे, नाटय़कलाकार राजदीप नाईक, आपचे नेते पुती गावकर व इतरांची उपस्थिती होती.
गुणवंती गावकर, सुश्मिता गावकर, संजना गावकर यांनी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत केले. यावेळी केजरीवाल म्हणाले की, दिल्ली राज्यात वेगवेगळय़ा क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडून आलेला आहे. सदर राज्यात जवळपास अकरा हजार सरकारी शाळांचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे. यामुळे खासगी शाळांतील विद्यार्थ्यांनी सरकारी शाळेमध्ये आपले स्थलांतर करून दर्जात्मक शिक्षण प्राप्त करून देण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरुवात केलेले आहेत. 70 वर्षानंतर दिल्लीत प्रथमच चांगल्या प्रकारच्या शाळा निर्माण करून शैक्षणिक विकासाला महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. त्याचप्रमाणे दिल्ली सरकारने मोफत औषधे व उपचार करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. यामुळे दिल्ली राज्यातील जनता आपवर खुश आहे. गोव्यामध्ये आप प्रत्येक घरी एक नोकरी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने प्रयत्न करेल. यदाकदाचित ही नोकरी उपलब्ध करून देण्यास विलंब झाल्यास प्रत्येकाला प्रत्येकी तीन हजार रुपये महिना बेकारी भत्ता देण्याचे आश्वासन यावेळी केजरीवाल यांनी दिले.
मुद्दामहून जमिनीचा प्रश्न प्रलंबित : सत्यविजय नाईक
सत्यविजय नाईक यांनी यावेळी बोलताना या भागातील राजकारण्यानी मुद्दामहून जमिनीचा प्रश्न प्रलंबित ठेवल्याचा आरोप केला. अल्वारा मोकाशे महसूल अशाप्रकारच्या वेगवेगळय़ा जमिनी आहेत. त्याचप्रमाणे अभयारण्य माध्यमातून सत्तरी तालुक्मयातील जनतेवर महाभयंकर संकट उभे राहिले आहे. त्या कचाटय़ातून या भागातील जनतेला बाहेर काढणे हे आपचे प्रथम कर्तव्य राहणार असल्याचे यावेळी म्हणाले.
सत्तरी तालुक्यात नेटवर्कचा अभाव : म्हांबरे
राहुल म्हांबरे यांनी यावेळी सत्तरी तालुक्मयातील अनेक गावात आज नेटवर्कची सुविधा निर्माण झालेली नाही. यामुळे अनेक गावातील मुलांना ऑनलाइन पद्धतीच्या शिक्षणासाठी घनदाट जंगलामध्ये बसावे लागत आहे. हे दुर्दैव असल्याचे यावेळी ते म्हणाले.
यावेळी बाबुराव पर्येकर यांनी जमिनीचा प्रश्न व नेटवर्कची सुविधा यासंदर्भाची समस्या मांडली. दयानंद गावकर यांनी जमीन मालकी प्रश्नावर प्रकाशझोत टाकला. केशव हरवळकर यांनी गोवा मुक्त होऊनसुध्दा सत्तरी तालुक्मयातील जनता पारतंत्र्यात आहे, असा आरोप करून वन खात्याच्या माध्यमातून शेतकरीबांधवांच्या समोर भयानक समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपस्थितांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे निरसन केजरीवाल यांनी केले. सूत्रसंचालन महादेव नाईक यांनी केले तर शेवटी शुभम शिवलकर यांनी आभार मानले.