नेपाळी कामगारांची जिल्हाधिकाऱयांकडे धाव
प्रतिनिधी/ बेळगाव
कामासाठी नेपाळ देशातील अनेक जण बेळगावात दाखल झाले होते. आता त्यांनाही आपल्या गावी परतायचे आहे. एक तर काम नाही तसेच इतके दिवस काम करुन घेतलेल्या मालकांनाही त्यांच्याकडे पाठ फिरविल्यामुळे मोठय़ासंकटात आम्ही सापडलो आहे. तेंव्हा आम्हाला काही करुन आमच्या गावी परत पाठवावे, अशी गयावया ते करु लागले आहेत. जिल्हाधिकाऱयांकडे धाव घेऊन ते विचारणा करत आहेत. त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शनच मिळणे कठीण झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळपासूनच ते थांबले होते. बाहेरच्या देशामध्ये जात असल्यामुळे आम्ही काहीच करु शकत नाही, असे त्यांना सांगण्यात येत आहे. एक तर खायाला अन्न नाही आणि जायला मार्ग नाही. यामुळे आम्ही काय करु, असे ते सांगत होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे काम करुन घेतलेल्या अनेक व्यवसायिकांनी पाठ फिरविली आहे. त्यांच्या विरोधात फिर्याद देण्यासही ते घाबरत आहेत.
आम्हाला आता आमच्या गावी जायचे आहे. तेंव्हा काही तरी मदत करा, असे ते सांगत होते. 141 जण बेळगावात आहेत. विविध हॉटेल, स्वीटमार्ट व इतर दुकानांमध्ये काम करुन ते पोट भरत आहेत. मात्र आता अडचणीत आले असून त्यांना मदतीची गरज आहे. तेंव्हा जिल्हाधिकाऱयांनी आमच्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करत होते.