ऑनलाईन टीम / सातारा :
मराठा आरक्षण हा केंद्राचा विषय नाही. तो राज्याच्या आखत्यारीतील विषय आहे. राज्य सरकार दिशाभूल करण्याचे काम करत आहे. आरक्षणासाठी आंदोलनाची वेळ येते हे दुर्भाग्य आहे. ठाकरे सरकारने लवकरात लवकर आरक्षणासंदर्भात भूमिका घ्यावी, अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा साताऱ्यातील खा. श्री. छ. उदयनराजे यांनी दिला आहे.
उदयनराजे म्हणाले, शिवराज्याभिषक दिनानिमित्त आज रायगडावर छ. संभाजीराजे यांनी 16 जूनपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा एल्गार केला आहे. कोल्हापुरातील राजर्षी शाहुंच्या समाधीपासून या आंदोलनास प्रारंभ होणार आहे. संभाजीराजे हे माझे धाकटे भाऊ आहेत. त्यामुळे आमच्यात मतभेद असण्याचे कारण नाही. आरक्षणासाठी आंदोलनाची वेळ येते हे दुर्भाग्य आहे. ठाकरे सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घ्यावी, अन्यथा उदेक होईल. माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे.