अधिकाऱयांनी नागरिकांना वारंवार सूचना करूनही दुर्लक्ष : गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाकाळात अनेक कार्यालये बंद अवस्थेत होती. तर काही कार्यालयात शुकशुकाट पसरला होता. आता कोरोना आटोक्मयात आल्याने सर्वच कार्यालयातील गर्दी वाढू लागली आहे. सध्या आरटीओ कार्यालयातही मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. परिणामी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी व कोरोनाचे नियम पाळण्यात यावेत, यासाठी आरटीओ शिवानंद मगदूम हे स्वतः नागरिकांना सूचना करताना दिसत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
कोरोना नियमांचे पालन न केल्यास संबंधित नागरिकांची कामे करू नयेत, असे आवाहन आरटीओ शिवानंद मगदूम यांनी अधिकाऱयांना केले. मात्र याचे नागरिकांनाच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यापुढे तरी नागरिक नियम पाळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्ते वाहतूक कार्यालयात नेहमीच गर्दी होत असते. मात्र येथे येणारे नागरिक आपली कामे करून घेण्यासाठी कोरोना नियमांचे उल्लंघन करत आहेत. तर प्रवेशद्वारावर असणाऱया होमगार्डवर दादागिरीचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
स्वतः आरटीओ नागरिकांना कोरोनाचे नियम पाळा, असे आवाहन करतानाचे चित्र दिसत आहे. मात्र याचे सोयरसुतक नागरिकांना नसल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनाची भीती गेली की काय? असेच चित्र आरटीओ कार्यालयात दिसून येत आहे. मात्र अधिकारी आणि स्वतः आरटीओ नागरिकांना वारंवार सूचना करत आहेत. याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने अनेकांची डोकेदुखी वाढविणारा ठरत आहे. अशा परिस्थिती वाहन परवाना व इतर कामांसाठी येणारे नागरिक सामाजिक भान ठेवणे विसरत आहेत.
कोरोनाचा फैलाव काही प्रमाणात आटोक्मयात आला असून कार्यालयातील गर्दी मात्र कमी होत नाही. आरटीओ कार्यालय देखील जनतेला समस्या निर्माण होऊ नये यासाठी सुरू ठेवण्यात आले आहे. मात्र नागरिकांनी दाखविलेली निष्काळजी अधिकाऱयांची डोकेदुखी वाढविणारी ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांना आरटीओंनीच नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात आहे. मात्र नागरिकांनी दुर्लक्ष करून अधिकाऱयांची डोकेदुखी वाढविली
आहे.
हा आजार आपल्या कार्यालयात शिरल्यास याचा मोठा परिणाम महसुलावर होणार आहे. जनतेमध्ये अजूनही सोशल डिस्टन्सबाबत जागृती नाही. त्यामुळे खुद्द आरटीओ शिवानंद मगदूम हे रांगेत उभे राहिलेल्या व्यक्तींना सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर करण्याच्या सूचना करत आहेत. मात्र त्यांच्या या आवाहनाला नागरिकांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
नियम पाळण्याची गरज
बेळगाव येथील एक मुख्य कार्यालय म्हणून ओळखले जाणारे आरटीओ कार्यालय (रस्ते वाहतूक कार्यालय) सुरक्षित ठेवण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष झाले आहे. आरटीओ कार्यालय परिसरात आता मार्किंग करण्यात आले असली तरी नागरिक एकामेकांवर पडून आपले पहिला काम होईल यावरच भर देत आहेत. मात्र याचा फटका अधिकाऱयांना बसत आहे. अजूनही तशीच परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे नियम पाळण्याकडे नागरिकांनीही लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.