प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील सदरबझार परिसरात असलेल्या आरटीओ कार्यालय परिसरात रविवारी रात्री धुडगुस घालत टपऱया रस्त्यावर उलटून टाकल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने सुत्रे हलवत क्षेत्रमाहुलीतील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
दि. 8 रोजी मध्यरात्री आरटीओ परिसरात कार्यालयाच्या कडेने असलेल्या विविध व्यवसायिकांच्या टपऱया उलटून टाकण्यात आल्या होत्या. काही टपऱया तोडून त्यांचे नुकसानही करण्यात आले होते. संचारबंदी लागू असताना देखील असे कृत्य करणाऱया टोळक्यावर कारवाई करा, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह टपरीधारकांनी केली होती.
सातारा शहर पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने तातडीने कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱया टोळक्याचा शोध सुरु केला असून याप्रकरणी निखिल सर्जेराव रसाळ (वय 21), अक्षय विलास पवार (वय 21), प्रवीण राजेंद्र पवार (वय 27, सर्व रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल अंबादास केकाटे यांनी याबाबत तक्रार दिली असून या गुन्हय़ाचा पुढील तपास पोलीस नाईक झेंडे करत आहेत. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.