प्रतिनिधी / बेळगाव
लोकसभा पोटनिवडणूक होत असून प्रत्येकाने या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावावा यासाठी गेल्या 15 दिवसांपासून विविध खात्याकडून जनजागृती करण्यात येत आहे. आरटीओ आणि जिल्हा स्वीप समितीच्यावतीने नुकतीच जनजागृती करण्यात आली आहे. याबाबत एका पत्रकाचेही अनावरण करण्यात आले आहे.
या जनजागृती फेरीमध्ये रिक्षा चालकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग दर्शविला. किल्ला तलावापासून ही जनजागृती फेरी काढण्यात आली. शहरातील विविध भागांतून ही जनजागृती फेरी काढण्यात आली असून यामध्ये मतदारांना आवाहन करण्यात आले आहे. मतदानाचा हक्क बजावा आणि लोकशाही बळकट करा, असे यावेळी सांगण्यात येत होते. या जनजागृती फेरीमध्ये आरटीओ शिवानंद मगदूम, कचेरी अधिकारी शरणाप्पा हुग्गी, दुडगुंटी यांच्यासह इतर कर्मचारी, रिक्षाचालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.