स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम : स्वातंत्र्यसंग्रामातील योद्धय़ांच्या वेशभूषेसह विद्यार्थ्यांची प्रभातफेरी
प्रतिनिधी / बेळगाव
एकेई संस्थेच्या आरपीडी कॉलेजमध्ये कर्नाटक सरकार व राणी चन्नम्मा विद्यापीठ यांच्या आदेशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘आजादी का अमृतमहोत्सव’ असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. प्राचार्या डॉ. शोभा नाईक यांनी महोत्सवाचे उद्घाटन करून स्वातंत्र्यलढय़ातील योद्धय़ांचे योगदान विषद केले.
त्यानंतर कॉलेजच्या इतिहास विभागातर्फे भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये माधुरी बागवे, श्रीनिधी राव, संपदा कट्टी, प्रशांत कोलकार, श्वेता हंदिगोळ यांनी बक्षिसे मिळविली. यानंतर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरोजिनी नायडू, सावित्रीबाई फुले, कित्तूर चन्नम्मा, ओनके ओबव्वा यांच्यावर आधारित वेषभूषा करून विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली.
या कार्यक्रमासाठी कॉलेजचा एनएसएस, एनसीसी, स्काऊट ऍण्ड गाईड, वायआरसी विभागांचे सहकार्य लाभले. नुपूर रानडे यांनी प्रार्थना सादर केली. डॉ. एच. बी. कोलकार, प्रा. विजयकुमार पाटील, प्रा.सी. एम. मुन्नोळी, प्रा. रामकृष्ण, डॉ. कुरणे, डॉ. सुनंदा कित्तली, डॉ. अभय पाटील, डॉ. पूजा पाटील, प्रा. मयूरी, प्रा. पूजा, प्रा. अमिना मुजावर, प्रा. ऐश्वर्या रानडे, प्रा. मायाप्पा पाटील, प्रा. प्रसन्न जोशी यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक कार्यक्रमाला उपस्थित होते. कॉलेजमधील स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सांगता झाली.