प्रतिनिधी /बेळगाव
एसकेई सोसायटीच्या आरपीडी कॉलेजच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त पु. ल. देशपांडे रंगमंचावर शहीद दिवस आचरण्यात आला. विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. विजयकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले.
त्यानंतर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, उमाजी नाईक, राणी चन्नम्मा, राणी लक्ष्मीबाई, संभाजीराजे, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, लोकमान्य टिळक यांच्यासह राष्ट्रपुरुषांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यालय अधीक्षक एम. एस. चिकमठ, डॉ. एस. एस. कुरणी, डॉ. हरिष कोलकार, प्रा. एम. एम. पाटील, प्रा. इंदिरा होळकर यांनी महात्मा गांधी यांच्या स्मृतीला अभिवादन केले. संपदा कट्टी, श्रीनिधी राव, नुपूर रानडे या विद्यार्थिनींनी रघुपती राघव राजाराम हे भजन सादर केले. मयूर कदम यांनी आभार मानले.