गणेशोत्सव नियमावलीत चाकरमानी-स्थानिकांसाठी सुवर्णमध्य साधणार – पालकमंत्री
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन नव्याने सोनवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला आणि 11 उपकेंदांच्या निर्मितीला मंजुरी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाला जिल्हय़ाबाहेरून येणाऱयांसाठी नियमावली ठरवताना चाकरमानी किंवा स्थानिकांना त्रास होणार नाही, अशीच नियमावली केली जाणार आहे. तशा सूचना जिल्हाधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
पाककमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते उपस्थित होते.
ज्या भागात आरोग्य सुविधा पोहोचत नाहीत किंवा आरोग्य केंद्रांपर्यत जाण्यास लांब अंतर पडते, याचा विचार करून आरोग्य केंद्र व उपकेंदे नव्याने निर्मितीसाठी प्रस्तावित होती, त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हय़ात कुडाळ तालुक्मयात सोनवडे हे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे. तसेच नव्याने 11 उपकेंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये कुडाळ तालुक्मयातील गोवेरी, माडय़ाचीवाडी, सावंतवाडी तालुक्मयातील भोम-कोलगाव, सोनुर्ली, दोडामार्ग तालुक्मयातील मोरगाव, वझरे, घोटगेवाडी, वेंगुर्ले तालुक्मयातील रेडी नं. 2, पेंडूर, कामळेवीर आणि कणकवली तालुक्मयातील असलदे येथे नव्याने उपकेंदे निर्मितीसाठी मंजुरी देण्यात आली. शासनानेही मंजुरी दिली असून त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी विशेष प्रयत्न केल्याची माहिती पालकमंत्री सामंत यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या नियमावलीत सुवर्णमध्य
सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा कोरोना पॉझिटीव्हिटी दर कमी होऊ लागला असून रॅपीड टेस्टमध्ये पाच ते सहा टक्क्यांपर्यंत आणि आरटीपीसीआरचा सात ते आठ टक्के पॉझिटीव्हीटी दर आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे. काही ठिकाणी अतिगंभीर रुग्ण झाल्यावर सरकारी दवाखान्यात दाखल केले जातात. हे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात येत आहेत. तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियमावली बनविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत. चाकरमानी आणि स्थानिक लोकांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने नियमावली करण्यात येणार आहे.
गतवषीच्या गणेशोत्सवाची आणि यावषीची परिस्थिती वेगळी आहे. आता कोरोना प्रतिबंधात्मक लस अनेकांनी घेतली असून अजून लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
किल्ले संवर्धनात सिंधुदुर्ग, विजयदुर्गचा समावेश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील किल्ले संवर्धनासाठी योजना जाहीर केली आहे. त्यामध्ये जिल्हय़ातील सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हय़ातील पाच शासकीय विश्रामगृहे बांधण्यात येणार असल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी दिली.
वेंगुर्ल्याच्या व्यासपीठावर युती ठरत नाही!
वेंगुर्ले मच्छीमार्केटच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये शिवसेना, भाजप नेत्यांनी एकमेकांची पाठ थोपटली म्हणजे शिवसेना-भाजप युती होणार असे म्हटले जाते, हे योग्य नाही. वेंगुर्ल्याच्या व्यासपीठावर युती ठरत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणारे आहेत, असे सांगत त्या कार्यक्रमात कोण काय बोलले हे माहीत नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.