(अध्याय तिसरा)
माया कशाला म्हणता येईल? जे जे नजरेला दिसते ते ते सर्व नाशिवंत असते आणि जे नाशिवंत असते ते सर्व खोटे असते पण माणूस त्यालाच खरे धरून चालतो यालाच मायेचा प्रभाव असे म्हणतात आणि माणसाला त्याचे फार आकर्षण! त्यामुळे सत्याचा विपर्यास करून माणूस सहजी मायेच्या जाळय़ात अडकतो. जर भगवंतांना भेटायचे असेल तर मायारूपी नदी आपल्याला ओलांडावी लागेल कारण भगवंत या मायारूपी नदीच्या पलीकडील तीरावर आहेत. पण ही माया नदी अतिशय दुस्तर म्हणजे तरून जायला अतिशय अवघड आहे आणि ती ओलांडल्याशिवाय आपली भगवंतांबरोबर गाठ पडणार नाही. माया नदी तरून जायचा मार्ग सद्गुरुंना माहीत असतो म्हणून त्यांना मनोभावे शरण जावे असे अर्षभ प्रबुद्ध यांनी सांगितले. नुसते शरण जाऊन उपयोग नाही तर त्यांच्या कृपेचा संपूर्ण लाभ मिळवण्यासाठी आपण सतशिष्य व्हायला पाहिजे हेही सांगितले. सतशिष्य कसे व्हायचे याचे ज्ञानही सद्गुरुच देतात त्यासाठी जे गुण अंगी बाणावे लागतात त्यासाठी ते शिष्याला मार्गदर्शन आणि मदत करतात. या आवश्यक गुणांपैकी संतसंग, शुचिर्भूतपणा, तप, सहिष्णुता, मौन आदी गुणांचा आपण अभ्यास केला. सतसंगती लाभलेला शुचिर्भूत माणूस तप करून सहिष्णू होतो. कारण त्याच्यात सुखदुःखाकडे अलिप्ततेने पाहण्याची दृष्टी निर्माण होते, म्हणजेच या सगळय़ामागे भगवंतच आहेत हे त्याच्या ध्यानात येते. भगवंताच्या सर्वव्यापी अस्तित्वाने प्रभावित होऊन तो मौन बाळगतो. हे मौन म्हणजे लोक समजतात तसे फ़क्त न बोलणे नसते तर सर्वव्यापी भगवंताच्या अस्तित्वाची खात्री पटलेली असल्याने इतर कोणत्याही विषयांचे विचारसुद्धा मनात येत नाहीत मग बोलणे आपोआपच बंद होते. आता आपण ‘आर्जव’ या गुणाची माहिती घेऊ. मौनाचे माहात्म्य जाणून घेताना आपण बघितले की, सद्गुरु आपल्याला निंदा, स्तुती, वाद संवाद यापासून दूर ठेवून नामस्मरणात गुंतवतात. आता आपण जेव्हा असे ठरवतो की आपल्याकडून आपण निंदा, स्तुती, वाद संवाद या कशात पडायचे नाही. पण इतरेजन तुमची निंदा करायला, तुमच्याशी वाद घालायला, थोडक्मयात म्हणजे तुम्हाला उचकवायला, टपलेलेच असतात. त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायला शिकणे याचे नाव आर्जव! यामध्ये आपण सारे एकाच ईश्वरापासून तयार झालेलो आहोत म्हणजे आपण सर्व एकमेकांचे नातेवाईक आहोत, हा भाव मनात दृढ करायचा आहे. असा आर्जवी स्वभाव गुरुदीक्षेतून तयार होतो. विषयातून मिळणारा आनंद हा परमानंद आहे असा सर्वसाधारण समज आहे. त्यामुळे यासाठी काहीही करायला लोक एका पायावर तयार असतात. पण हे सुख क्षणिक आहे याची जाणीव सद्गुरु आपल्याला करून देतात आणि आपल्याला आत्मस्वरूपाची गोडी लावतात. सद्गुरुच्या कृपेमध्ये हे सर्व सामर्थ्य असते. विषयांची सर्व आवड ते आत्मस्वरूपाकडे खेचून आणतात. गुरुवाक्मयावरील नि÷sमुळे विषय खोटे आहेत हे लक्षात येते आणि त्याची विषयांची आवड संपते. पुढील गुण अहिंसा हा आहे त्याची माहिती पुढे घेऊ. क्रमशः