तेजी टिकवण्यात अपयश : सेन्सेक्स 536 अंकांनी घसरला
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ात सुरुवातीला कच्च्या तेलाचे भाव कोसळल्यामुळे शेअर बाजाराची वाटचाल दबावात सुरु होती. परंतु त्यानंतर दोन दिवसांपूर्वी फेसबुक आणि रिलायन्स जिओ यांच्या एकत्रितपणे झालेल्या भागीदारीमुळे बाजाराला गमावलेली तेजी पुन्हा मिळविण्यात यश मिळाले होते. त्यामुळे सलग दोन दिवस मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स तेजीचा प्रवास करीत होता.
आठवडय़ातील शेवटच्या दिवशी मात्र आर्थिक आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभाग विक्रीच्या कामगिरीमुळे सेन्सेक्स दिवसअखेर 535.86 अंकांनी घसरुन निर्देशांक 31,327.22 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 159.50 अंकांनी घसरुन निर्देशांक 9,154.40 वर बंद झाला आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे अगोदरच जगभरातील आर्थिक क्षेत्र दबावात आपली वाटचाल करीत आहे. या कारणामुळे उद्योगक्षेत्राला दिलासा मिळत नसल्याने उद्योजक आपली गुंतवणूक करताना चिंता व्यक्त करत दबावात करत असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये बजाज फायनान्सचे समभाग सर्वाधिक म्हणजे 9 टक्क्मयांनी घसरले आहेत तर सोबत ऍक्सिस बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांच्या समभागातही घसरण झाली. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग तीन टक्क्मयांनी वधारले. सन फार्मा, हिरो मोटोकॉर्प, लार्सन ऍण्ड टुब्रो, पॉवरग्रिड आणि बजाज ऑटो यांच्या समभागातही तेजी पहावयास मिळाली.
आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात शुक्रवारी घसरणीचे वातावरण राहिले. इकडे देशातील म्युच्युअल फंड क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी फ्रँकलिन टेंपलेटन यांनी कोविड 19 च्या काळजीपोटी देशातील जवळपास 6 म्युच्युअल फंडच्या योजना बंद करणार असल्याचे बोलले जात आहे. गुंतवणूकदारांची या फंडात असलेली गुंतवणूक अडकून राहण्याच्या भीतीचा प्रभाव बीएसई बाजारावर राहण्याचे संकेत व्यक्त होत आहेत.