ऑनलाईन टीम / दिसपूर :
आसामसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज हाती येत आहेत. आसाम विधानसभेच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या 119 जागांच्या कलांनुसार भाजप आणि मित्रपक्षांनी जोरदार मुसंडी मारली असून, ते 76 जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेस 41 आणि आयएनडी 2 जागांवर पुढे आहे.
आसाम विधानसभेच्या 126 जागांसाठी निवडणूक झाली होती. बहुमत मिळविण्यासाठी या राज्यात 64 जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. आसाममध्ये सध्या भाजपचे सरकार असून, पक्षाने पुन्हा सरकार स्थापण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. आतापर्यंतच्या कलांनुसार भाजप सत्ता कायम राखणार असल्याचे दिसून येते.