पंतप्रधान मोदींची घोषणा : अमर जवान ज्योत राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अमर जवान ज्योतीचे राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीनीकरण करण्याच्या निर्णयानंतर आता पंतप्रधान मोदींनी मोठी घोषणा केली. इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ग्रॅनाईटचा पुतळा साकारण्याची घोषणा शुक्रवारी पंतप्रधानांनी केली आहे. ट्विट करून ही माहिती देतानाच हा पुतळा म्हणजे देशाच्या ऋणानुबंधाचे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, शुक्रवारी दिल्लीत इंडिया गेटवर 50 वर्षांपासून तेवत असलेली अमर जवान ज्योत राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये विलीन करण्यात आली.
पंतप्रधानांनी स्टॅच्यू ऑफ यूनिटीनंतर आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा पुतळा उभारण्याआधी 23 जानेवारी रोजी त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी होलोग्रामचे अनावरण करण्यात येणार आहे. होलोग्राम कसा असणार याबाबत पंतप्रधानांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. जोपर्यंत नेताजींचा पुतळा तयार होत नाही तोपर्यंत होलोग्राम प्रतिमा लावण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 23 जानेवारीला होलोग्राम पुतळय़ाचे अनावरण करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ही घोषणा करताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करुन पंतप्रधानांच्या घोषणेचे जाहीर स्वागत केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा 28 फूट उंच आणि सहा फूट रूंद असेल. इंडिया गेट येथे चार खांबांचा एक मंडप आहे. या ठिकाणी आधी पाचव्या जॉर्ज राजाचा पुतळा होता. इंग्रजांच्या काळात उभारण्यात आलेला हा पुतळा 1968 मध्ये हटविण्यात आला. यानंतर मंडपात पुतळय़ाची जागा रिक्त झाली, तिथे अद्याप कोणाचाही पुतळा उभारण्यात आलेला नाही. यामुळे मंडपात आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा येणार असल्याची शक्मयता व्यक्त होत आहे. ‘अमर जवान ज्योत’वरून मोदी सरकार विरुद्ध काँग्रेस असे चित्र निर्माण झाले असतानाच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळय़ाबाबतची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप
केंद्र सरकारने अमर जवान ज्योत दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीत विलीन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सैन्यातील अनेक आजी-माजी अधिकाऱयांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. पण काँग्रेसने या निर्णयाला विरोध केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याप्रश्नी टीका करताना काही लोक देशप्रेम आणि बलिदान समजू शकत नाहीत. आम्ही आमच्या सैनिकांसाठी अमर जवान ज्योत पुन्हा तेवत ठेवू, असे ट्विट केले. या टीकेचा सत्ताधारी भाजपनेही सडेतोड शब्दात समाचार घेतला आहे. ‘ज्यांनी 7 दशके राष्ट्रीय युद्ध स्मारक बनवले नाही, तेच लोक आमच्या हुतात्म्यांना स्थायी आणि उचित श्रद्धांजली वाहण्यावरून गदारोळ करत आहेत’, असे भाजपने म्हटले आहे.
पंतप्रधानांच्या घोषणेवर नेत्यांच्या प्रतिक्रिया…
गृहमंत्री अमित शहा ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील प्रति÷ित इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवण्याची घोषणा केली आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱया महान नेताजींना भावपूर्ण श्रद्धांजली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग ः नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवून देशभक्ती, स्वाभिमान आणि शौर्याची प्रेरणा भारतीय लोकांच्या आणि भावी पिढय़ांच्या मनात जागृत होईल. तसेच देश टिकवण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची भावना जागृत होईल.