मुंबई दूरदर्शनवरील ‘आमची माती आमची माणसं’ या लोकप्रिय कार्यक्रमातील ‘गप्पा-गोष्टी’द्वारे सर्वसामान्य मराठी कुटुंबापर्यंत पोहोचलेले ‘वस्ताद पाटील’ ते वयाच्या 84व्या वषीही एका खाजगी मराठी वाहिनीवर ‘अग्गं बाई सासुबाई’ या मालिकेद्वारे घराघरात चर्चेचा विषय बनलेले ‘बबडय़ाचे आजोबा’ या प्रदीर्घ वाटचालीद्वारे मराठी रसिकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करणारे, ज्ये÷ अभिनेते रवी पटवर्धन यांनी अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. धीरगंभीर आवाज, सहजसाध्य अभिनय, संवादांची अचूक फेक ही ज्यांची ओळख होती, त्यांचा केवळ आवाज ऐकून डोळे मिटून घेतले तरी व्यक्तिमत्त्व डोळय़ासमोर उभे राहावे आणि त्यांनी नेमकी कोणती भूमिका केली आहे याची उत्सुकता ताणली जावी असा अभिनय रवी पटवर्धन यांनी आयुष्यभर केला. शेवटच्या क्षणापर्यंत अभिनय करण्याची जिद्द-हट्ट त्यांनी खरा करून दाखवला. प्रकृतीचे चढ-उतार लक्षात येत असतानाही अत्यंत शांतपणे ते कॅमेऱयाला सामोरे जात होते. 1974 साली रत्नाकर मतकरी यांच्या ‘अरण्यक’ नाटकात केलेली धृतराष्ट्राची भूमिका त्यांनी वयाच्या ऐंशीव्या वषी पुन्हा साकारली. लॉकडाउनने खोडा घातला नसता तर कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत ते रंगभूमीवर काम करताना आणि विस्मरणावर मात करून पल्लेदार वाक्मयांचे संवाद सहज बोलताना दिसले असते. या नाटकाच्या दोन वर्षे आधी वयाच्या 80 व्या वषी भगवद्गीतेचे 700 श्लोक पाठ करून ते शृंगेरी पीठाच्या परीक्षेला बसले. शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत पहिले आले. ही जिद्द एखाद्या तरुणालाही लाजवणारी. स्पष्ट उच्चार, लांबच लांब संवाद हे लीलया म्हणावेत ते रवी पटवर्धन यांनीच. राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ या नाटकामध्ये सुधाकरची भूमिका करून नाटकाला उर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे काम त्यांनी केले. गडकरींनी लिहिलेल्या संवादात श्वास घ्यायलाही जागा अपुरी असते. तिथे अभिनेत्याचा कस लागतो. पटवर्धन यांनी केलेली सुधाकरची भूमिका सध्या युटय़ूबवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे, त्यातून रसिकांना त्यांच्या क्षमतेची अधिक जाणीव होईल. सातत्याने धीरगंभीर भूमिका साकारणारा अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहताना पुलंच्या ‘तुझे आहे तुझपाशी’ मधील काकाजींची भूमिका पाहिली म्हणजे इंदौरचे काकाजी म्हणजे हेच याची सर्वसामान्य रसिकालाही साक्ष पटेल इतका सहज सुंदर अभिनय आणि शेरोशायरीची बरसात. येणाऱया पिढीतील अभिनेत्याने जर काकाजी साकारायचा म्हटला तर त्यासाठी एक माईलस्टोन त्याचे नेहमीच सहर्ष स्वागत करायला उभा असेल. रिझर्व बँकेत कामाला असलेले आणि ठाण्यासारख्या मराठी संस्कृतीचा पगडा असलेल्या शहरात राहणारे हे व्यक्तिमत्त्व. पण, ग्रामीण महाराष्ट्रातील एखादा रांगडा पाटील असो, ‘बिन कामाचा नवरा’मधील शेतकरी सासरा असो किंवा ‘गप्पागोष्टी’मधील वस्ताद पाटील, एका पटवर्धनांना महाराष्ट्राने असा पक्का मराठमोळाच मानला! महाराष्ट्रभरातील विविध कंपन्यांमध्ये उत्पादित होणाऱया आणि ग्रामीण महाराष्ट्रात जोरात विक्री असणाऱया विविध उत्पादनांचे ते प्रदीर्घ काळ ब्रँड अँबेसिडर राहिले. त्यांची नाटके ना ग्रामीण महाराष्ट्राने पाहिली होती ना सगळे चित्रपट गावोगाव पोहोचले होते. पण शेतकऱयांच्या जीवनात मार्गदर्शन करणारा एक शेतीवरचा कार्यक्रम ग्रामीण भागातील घराघरात पोहोचला होता आणि त्यातील कोडे/हुमन घालण्याचा जो कार्यक्रम गप्पागोष्टी मध्ये व्हायचा, त्याची ओढ संपूर्ण महाराष्ट्राला होती. त्यातूनच खऱया अर्थाने ते महाराष्ट्रभर पोचले. ‘शिवपुत्र संभाजी’ नाटकातील औरंगजेब असो किंवा ‘मुद्राराक्षस’मधील अमात्य राक्षस. मराठी रसिकांनी त्यांना विविध रूपात आणि समकालीन विविध अभिनेत्यांशी तुलना करतच पाहिले. आणीबाणीच्या कठोर प्रसंगात इंदिरा गांधींना जयप्रकाश नारायण यांनी लिहिलेली पत्रे अचानकपणाने जेलच्या काळय़ा कोठडीतून बाहेर पडली. पुलंसारख्या व्यक्तिमत्त्वाने प्रथमच राजकीय भूमिका घेत त्या पत्रांचे ‘स्वगत’ बनवले. पण या स्वगताला एकपात्रीचे कोंदण चढवत साक्षात जयप्रकाश इंदिरांना सुनावत आहेत असा प्रयोग करण्याचे धाडस दाखवले तेही रवी पटवर्धन यांनीच. 1944 साली झालेल्या नाटय़महोत्सवाचे बालगंधर्व अध्यक्ष होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. त्या नाटय़महोत्सवातल्या बालनाटय़ात अवघ्या साडेसहा वर्षांच्या रवी पटवर्धनांनी भूमिका केली होती. तिथून सुरू झालेला हा प्रवास ‘अग्गं बाई सासुबाई’ मालिकेपर्यंत येऊन थांबला. या प्रवासामध्ये एक जिद्दी व्यक्तिमत्त्व आयुष्यभर स्वतःला आव्हान देत होते. ‘माझ्या मेंदू सोडून सर्व अवयवांवर शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. तरीही मी ठाम उभा आहे. मृत्यू अटळ आहे, पण नेहमीची औषधे, तपासण्या, व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर मृत्यूला लांब उभे करायला भाग पाडायचे ही माझी जिद्द आहे. पेराल ते उगवते या सिद्धांतावर माझी नितांत श्रद्धा आहे. माझा देवावर नव्हे नियतीवर विश्वास आहे. सत्कर्मावर विश्वास आहे’ असे सांगून 84 वर्षाचा युवक रोज नवी आव्हाने पेलत होता. एका रात्री अचानक त्याच्या हृदयाची धडधड थांबली तेव्हा नाटकाच्या भाषेत सांगायचे तर मृत्यूही ओशाळला असेल..! करिअरच्या मागे लागून सतत अस्वस्थ जीवन जगत अमली पदार्थाच्या अधीन होणारे आणि सतत आपल्याला कोणीतरी मागे टाकते या चिंतेने ग्रस्त होऊन जीवन फासावर लटकवणारे एकीकडे आणि मृत्यूलाही थांबवून अभिनय करणारे दुसरीकडे….तुमच्या मनाचे पारडे कुणीकडे झुकेल?
Previous Articleसखुबाई आणि डॉक्टर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.