कोल्हापूर / प्रतिनिधी
इस्पुर्ली येथील पिण्याच्या पाण्याच्या नाळाला सोडल्या जणाऱ्या पाण्यामध्ये जिवंत आळ्या सापडल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण गावातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्मांण झाला आहे.रंगीला तरुण मंडळ गल्लीच्या पाण्यात या आळ्या सापडल्याने गावातील नागरिक चांगलेच संतापले आहेत. वारंवार नळामधून गढूळ आणि आळ्या असलेले पाणी सोडले जाते.नागरिकांनी सुचना करुन पण याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून दुर्लक्ष न करता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
एकीकडे कोरोनासारख्या आजाराने नागरिक धास्तावलेले असताना दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खंडोबा करत असल्याचे दिसत आहे. गढूळ आणि आळ्या असलेले पाणी नळाला येत आहे. यापुर्वी ही हा प्रकार झाला होता आणखी दुसऱ्यांदा आजरांना आमंत्रण देणारा ठरु शकतो याची भीती लागून राहिली आहे. त्यामुळे ग्राम पंचायत प्रशासनाने गावातील पाण्याची टाकी तपासून व स्वच्छ धुऊन गावाला शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा. अन्यथा कोरोनाच्या टप्प्यात आर्थिक टंचाईने बेजार झालेले नागरिक आणखी दुसरे आजार उद्भवल्याने दवाखान्याला पैसा न घालता इतर आजारांनी अधिक हतबल होतील. त्यामुळे ग्राम प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आणि गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी गावातील नागरिकांमधून होत आहे.