– राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा पत्रकार परिषदेत आरोप
सोलापूर / प्रतिनिधी
ईडी ही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सल्ल्यानुसार वागते, हे अनेक प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्याला आता ज्ञान झाले आहे की, राज्यातील सरकार पाडण्यासाठी जे काही शक्मय आहे ते भाजप करत आहे. त्यासाठी ईडी आणि सीबीआय या संस्था आमच्या राज्यातील विरोधी पक्षाची सल्लामसलत करून कार्यवाही करतात, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा व पक्षप्रवेश संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शनिवारी सोलापूर दौऱयावर आले होते. हेरिटेज गार्डनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते.
राज्यात सध्या ईडी चौकशीवरून ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांची डोकेदुखी झाली आहे. जयंत पाटील यांच्यावरही डोळा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पाटील हे सोलापूर दौऱयावर असताना ईडीच्या चौकशीवरून प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले, ईडी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सल्ल्यानुसार वागते असाही आरोप पाटील यांनी केला. ईडी, सीबीआय लावणे हे अत्यंत दुर्दैवी, असेही पाटील यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेसाठी आमदार संजय शिंदे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे संतोष पवार, युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदी उपस्थित होते.
म्हणून दिल्लीत पंतप्रधान मोदी, पवारांची भेट
नाबार्डचे हक्क काढून केंद्र सरकारने रिझर्व बँकेत दिले आहे. राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका लोकांना दाद देत नाहीत. सहकार क्षेत्र महाराष्ट्रात चांगले चालते, बँकाही चांगल्या चालतात. या बँकांना निर्बंध करण्याचे काम रिझर्व बँकेने केले आहे. निर्बंध कमी करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.
अजून काय म्हणाले पाटील
– आज झालेल्या गर्दीचे मी समर्थन करत नाही
– राष्ट्रपतिपदाची निवडणूक नाही उगाच वावडÎा उठवू नका
– दुहेरी पाईपलाईनच्या कामाला जास्त वेळ लागणार नाही
– जो करार झालाय तो पाळला पाहिजे, आम्ही सुशीलकुमार शिंदे साहेबांचा आदर करतो, त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केले आहे.