प्रतिनिधी / सांगे
सांगे तालुक्मयात उगे ते भाटी अशी जायकाची जलवाहिनी घालण्यासाठी रस्त्याच्या बाजूने खोदण्यात आलेल्या चरावर भर पावसात डांबरीकरण करण्यात येत असून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या या प्रकारावर भाटीचे पंच मनोज पर्येकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या दिवसांत दररोज पाऊस पडत असून डांबरीकरण काम चालूच आहे. त्यामुळे घातलेल्या डांबराची शाश्वती देणे कठीण आहे. मुळात खोदण्यात आलेल्या चरावर दगड घालून त्यावर डांबर घालण्यात येत आहे. पावसामुळे डांबर घातलेला रस्ता खचून आत गेला आहे. खरे म्हणजे पावसापूर्वी डांबरीकरण काम पूर्ण होणे महत्त्वाचे होते. पण मंदगतीने काम चालू असल्याने पूर्ण झाले नाही. दगडावर खडी देखील कमी प्रमाणात घालण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पावसाळय़ात डांबर घालून सरकारचे पैसे पाण्यात टाकण्यापेक्षा सध्या ज्या ठिकाणी रस्ता खचलेला आहे तेथे दगड घालून दुरुस्ती करावी व पाऊस संपल्यावर डांबरीकरण करणे उचित ठरेल, अशी प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होत आहे.