नाल्याची स्वच्छता करण्याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उज्ज्वलनगर नाल्याची स्वच्छता करण्याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. तसेच या नाल्याच्या काठावर माती टाकून अतिक्रमण करण्यात येत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. शहरातील सांडपाण्याचा निचरा होणाऱया नाल्यावर अतिक्रमण झाल्याने नाल्याचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनीही कानाडोळा केला असल्याचा आरोप होत आहे.
मिलन कॉलनी, उज्ज्वलनगर परिसरामधून नाला वाहत असून नाल्याद्वारे उन्हाळा व पावसाळय़ात कायम सांडपाणी वाहत असते. पण नाल्यामध्ये अतिक्रमण होत असल्याने पावसाळय़ात सांडपाणी परिसरातील घरामध्ये घुसत आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱयांकडे तक्रार करूनही याची दखल घेतली नाही. राष्ट्रीय महामार्गाशेजारी कनकदास चौकाशेजारी नाला वाहतो. सदर नाला उज्ज्वलनगरमधून बळळारी नाल्याला मिळतो. नाल्यावर माती टाकण्यात येत असून काही ठिकाणी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणाबाबत तक्रारी करूनही याची दखल घेण्यात येत नसल्याने नाल्याच्या काठावर इमारती बांधण्याचे प्रमाण वाढले आहे. तरीही याकडे महापालिकेच्या अभियंत्यांनी दुर्लक्ष केले आहे. नाल्यावरील अतिक्रमणामुळे सांडपाणी वाहण्यास अडचण होत आहे.
परिसरात दुर्गंधी
विविध नाल्यांची स्वच्छता महापालिकेच्या अधिकाऱयांनी केली आहे. मात्र शहर व उपनगरातील बहुतांश नाल्यामधील कचरा अद्यापही जैसे थे आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱयांकडे तक्रार करूनही याची दखल घेतली नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचून राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यालगत नाला असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनामधून येणारे नागरिक नाल्यामध्ये कचरा टाकत आहेत. मृत जनावरे, कुत्री, मांजरे आदी नाल्यात टाकत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
नाल्याची स्वच्छता करावी
नाल्याच्या काठावर कचरा साचला असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशातच नाल्यावर माती टाकण्यात येत असून काही ठिकाणी नाल्यावर अतिक्रमण केल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. परिणामी पावसाळय़ात नाल्यामधील सांडपाण्यामुळे मोठी समस्या निर्माण होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे नाल्याची स्वच्छता करून अतिक्रमण रोखण्याची मागणी होत आहे.