ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना संकटामुळे उत्तरप्रदेश सरकारने कर्मचाऱ्यांना मिळणारा सहावा भत्ता थांबवला आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशातील 16 लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून 5 हजारांची कपात होणार आहे. कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्य सचिव संजीव मित्तल यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी राज्यभरात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे राज्य सरकारला निधी कमी पडू लागला. तसेच उत्पन्नाची साधने कमी झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांचा 6 वा भत्ता थांबवण्याचा निर्णय त्यांनी उत्तरप्रदेश सरकारने घेतला.
उत्तरप्रदेश सरकारच्या या निर्णयानंतर कर्मचार्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, कर्मचार्यांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. 24 एप्रिल रोजी राज्य सरकारने 31 मार्च 2021 पर्यंत हे भत्ते पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. हे भत्ते हटवल्यास दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीवरील 24,000 कोटी रुपयांचा भार कमी होईल, असे सरकारने म्हटले आहे.