ऑनलाईन टीम / कोटद्वार :
देशातील विविध राज्यात दहशत पसरविणाऱ्या टोळधाडीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन उत्तराखंडमधील कृषी क्षेत्रात अलर्ट जाहीर केला आहे. कोटद्वार मधील फिल्डवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या भागात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
कृषी अधिकारी आर के गहलोत यांनी रविवारी कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत शेतकऱ्यांना या संदर्भात जागृत राहण्याचे आदेश द्या असे सांगण्यात आले. तसेच फिल्ड वरील कर्मचाऱ्यांना या संदर्भात सर्व भागात बॅनर लावण्यास सांगितले. जेणकरून शेतकऱ्यांमध्ये जगृकता निर्माण होईल. त्या बरोबरच सर्व केंद्रांमध्ये कीटनाशक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
तसेच शेतमजूरांसाठी स्प्रे मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ज्या शेतमजूरांकडे स्प्रे मशीन नाही आहेत ते, विभागाकडून अनुदान घेऊन मशीन खरेदी करू शकतात. या बरोबरच टोळधाडीने हल्ला केल्यास मोठा आवाज करणारी यंत्रे, ढोल, डीजे, मोटार सायकलचे सायलेन्सर, थाळी, भांडी आदी वाजवण्याचे तसेच फटाके फोडण्याचा सल्ला दिला आहे.
पुढे ते म्हणाले, ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरच्या सहायाने चालणारी मशीन तयार ठेवावीत आणि रिकाम्या शेतात पाणी भरून ठेवण्यास सांगितले आहे. हे उपाय केल्याने टोळधाड पळून जाते.