कोल्हापूर : प्रतिनिधी
उद्यापासून वाईट लोक कोल्हापुरात यायला सुरुवात होईल, आम्ही काय केलं? आम्ही पुण्याला का गेलो? हे सांगायला सुरुवात करतील. असा टोला उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी लगावला. ते महाविकास आघाडीच्या प्रचार मेळाव्यात बोलत होते.
पुढे सामंत म्हणाले, अख्या राज्यातील भाजप आले तरी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला हरवू शकत नाहीत. 9 एप्रिलला आदित्य ठाकरे प्रचारासाठी कोल्हापुरात येणार आहेत, अजित पवार देखील येणार आहेत. अशी माहिती सामंत यांनी दिली. शिवसैनिकांनो कामाला लागा, ही जागा शिवसेनेमुळे निवडून आली हे सांगण्याचे भाग्य उद्धव ठाकरे यांना मिळू दे, असे आवाहन सामंत यांनी केले.
पुढे उदय सामंत म्हणाले, ज्या पद्धतीने जयश्री जाधव यांच्याबद्दल प्रचार सुरू आहे. तो अतिशय वेदनादायक आहे. तो यापूर्वी मी कधी पहिला नाही. त्यामुळे महिलांनी पेटून उठा, आणि जयश्री जाधव यांना निवडून द्या. प्रचार करत असताना सर्वांनी भान ठेवणे आवश्यक असते. पण ते विरोधकांकडून होताना दिसत नाही असे उदय सामंत म्हणाले. विजयी करताना असा विजय करा की, विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाले पाहिजे. आणि विजयी मेळावा तितक्याच जोराने झाला पाहिजे,असे सामंत म्हणाले.