वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
देशातील उर्जा क्षेत्राला मोठय़ा प्रमाणात आगामी काळात दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आता शहरांसोबत ग्रमीण भागातील गावांमध्येहीड 24 तास वीज उपलब्ध होणार आहे. यासाठी सरकाच्या मुख्य समस्यावर नियंत्रण मिळवत त्यावर उपाय उपलब्ध करण्याची यंत्रणा राबविण्यात येणार आहे.
यांच्यासाठी सरकारने वीज वितरण कंपन्यांना थकबाकीची पूर्तता करण्यासाठी पुन्हा एकदा 90 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक निधीची घोषणा केली आहे. आतापर्यंत वीज निर्मिती कंपन्यांवरील थकबाकी 94 हजार कोटी रुपयाच्या घरात पोहोचली आहे.
केंद्रांने वीज क्षेत्रातील लोकाना 24 तास वीज उपलब्ध करुन देण्यासाठी आगामी काळात योजना आखणार आहे. यातच डिस्कॉमवर सर्वाधिक थकबाकी केंद्र सरकारच्या वीज कंपन्यांची असून चालू आर्थिक वर्षातील सुरुवातीच्या कालावधी लक्षाम घेतल्यास एप्रिल 2020 मध्ये सर्व डिस्कॉमवर केंद्र सरकार वीज बनविणाऱया कंपन्यांची थकबाकी 40065.92 कोटी रुपयाची होती. जी एकूण थकबाकीच्या तुलनेत 40.73 टक्के आहे.
अक्षय ऊर्जाचे स्रोतही अडचणीत
पवन चक्की , सोलार या पाण्यावरती वीज निर्मिती करणाऱया कंपन्यांना भारतात विशेष दर्जा आहे. परंतु याच कंपन्या पर्यावरणाचा समतोल राखत आपले उत्पादन करुन ग्राहकांना सेवा देत असतात परंतु वीज बिलाच्या थकबाकीमुळे व कर्जामुळे या कंपन्यांचेही गणित पूर्णपणे मोडून पडले आहे.