वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एअर इंडियाची खरेदी करणाऱया इच्छुक कंपन्यांकडून सरकार बोली लावण्यासाठी निविदा मागविण्याची घोषणा केली होती. यासाठी सरकारने 17 मार्च ही तारीख निश्चित केली होती. परंतु त्यामध्ये वाढ करुन बोलीसाठीच्या निविदा येत्या 30 एप्रिलपर्यंत जमा करण्याची अधिसूचना शुक्रवारी सादर केली आहे. एअर इंडियाच्या पुनर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेसाठी एक समिती तयार करण्यात आली असून याचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत. यामधील मंत्र्याच्या समूहाने एअर इंडियाच्या बोलीसाठीच्या निविदा मागविण्याच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे तयार झालेले महामारीचे चित्र यांचे गांभीर्य लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असल्याचे गुंतवणूक आणि परिसंपत्ती विभागांचे संचालक दीपम यांनी सांगितले आहे. सरकारने इच्छुक खरेदीदारांना कंपन्यांच्या ग्रुपला एअर इंडियाचा व्हर्चुअल डाटा उपलब्ध करणार होती. त्यामध्ये संबंधीत प्रश्नांची उकल करण्यासाठी 6 मार्चपर्यंतचा कालावधीत दिला होता. सरकारने एअर इंडियामध्ये 100 टक्के हिस्सेदारी विकण्यासाठी 27 जानेवारीला एक अधिसूचना काढून घोषणा केली होती.