कोल्हापूर/प्रतिनिधी
गतवर्षी 5 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यावर महापुराचे आस्मानी संकट ओडवले होते. जिवितहानी झाली नसली तरी पूरबाधित क्षेत्रात बहुतांश जनावरांचा मृत्यू झाला होता. तसेच सध्या हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने, दक्षता म्हणून बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत एनडीआरएफची दोन पथके कोल्हापुरात दाखल होणार आहेत. यातील 25 जणांचे एक पथक कोल्हापुरात तर 25 जणांचे दुसरे पथक शिरोळ तालुक्यासाठी तैनात करण्यात येणार आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाली तर खबरदारी म्हणून एनडीआरएफचे 50 जवान कोल्हापुरात येणार आहेत.
महापुरासारखे अस्मानी संकट ओढवले तर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनान एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण करणार आहे. बुधवारी सायंकाळी 5 वाजता एनडीआरएफचे 50 जवान तयारीनिशी कोल्हापुरात दाखल होणार आहेत. दोन बोटी, आवश्यक 25 जवानांचे एक पथक कोल्हापुरसाठी तैनात करण्यात येणार आहे. कोल्हापुर पथकातील जवानांची निवास्थानाची व्यवस्था कसबा बावडा येथील ग्रामसेवक प्रशिक्षण शिबिर येथे करण्यात आली आहे. तर शिरोळ येथील जवानांच्या पथकाची निवासस्थानाची व्यवस्था दत्त साखर कारखाण्याच्या दत्त पॉलिटेक्निक कॉलेजवर करण्यात आली आहे.