नवी दिल्ली
भारत सरकारच्या एनपीएस व अटल पेंशन योजनेला 31 मार्च 2021 संपलेल्या आर्थिक वर्षात चांगला वाढीव प्रतिसाद मिळाला आहे. भारतीय पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) यांनी ही माहिती दिली आहे. 31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात एनपीएस व एपीआयसारख्या मुख्य योजनांमधील खातेदारांची संख्या 23 टक्के वाढून 4.24 कोटींवर पोहचली आहे. व्हर्च्युअल कॉन्फरन्सद्वारे पीएफआरडीएचे अध्यक्ष सुप्रतिम बंडोपाध्याय यांनी ही माहिती दिली. अटल पेन्शन योजनेत खातेधारकांची संख्या 33 टक्के वाढली आहे. यात 77 लाख नवे ग्राहक समाविष्ट झाले आहेत. एपीआय योजनेत खातेधारकांची संख्या 2.8 कोटी वर पोहचली आहे.