वार्ताहर/ कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन दिवस पडणाऱया मुसळधार पावसामुळे बुधवारी संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला. बुधवारी सकाळी दहाच्या दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने पावसामुळे वाहतूक तुरळक प्रमाणात होती. त्यामुळे कोणताही अनर्थ घडला नाही.
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवाराला संरक्षक भिंत आहे. या भिंतीजवळूनच ज्योतीनगरला जाण्याचा मुख्य रस्ता आहे. या बाजार समितीतील अर्ध्याहून अधिक पाणी येथूनच बाहेर पडते. त्यामुळे ही भिंत कमकुवत झाली होती. त्यातच आतील पाणी बाहेर जाण्यासाठी कोणतीच सोय करण्यात आली नाही. तसेच ही संरक्षक भिंत बांधून जवळपास चाळीस वर्षांचा कालावधी लोटला आहे. बुधवारी भिंत पडल्यानंतर बाजार समितीच्या अधिकाऱयांनी पडलेल्या भिंतीच्या मातीचे ढिगारे आणि दगड जेसीबीच्या साहाय्याने अन्यत्र हलविले आणि रस्ता खुला करून दिला.
भिंतीचे नव्याने बांधकाम करण्याची गरज
संरक्षक भिंतीची नव्याने बांधकाम करण्याची मागणी होत आहे. गेल्या अनेक वर्षांपूर्वी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. मात्र, पाणी जाण्यासाठी कोणतीच सोय करण्यात आली नाही. त्यातच भिंतीजवळूनच भाजी मार्केटसाठी प्रवेशद्वार आणि दुपदरी रस्ता बनविण्यात आला आहे. त्यासाठी रस्त्याच्या बाजूला संरक्षक भिंतीजवळ भराव घालून त्यावर रोलर फिरविण्यात आला आहे. त्यामुळे संरक्षक भिंत खालून कमकुवत झाली आहे. त्यामुळे इतर ठिकाणची भिंतही कोसळण्याची दाट शक्मयता आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संरक्षक भिंत नव्याने बांधावी, अशी मागणी ज्योतीनगरवासीय आणि कंग्राळी खुर्द ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे..